Letest News
लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल...
अ.नगरराजकीय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिपाडा कुटुंबाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले

उभे आयुष्य देशहितासाठी झिजवून तळागाळातील तसेच सर्वच स्तरातील घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. अशी प्रतिक्रिया डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी बोलताना व्यक्त केली. भारतीय संविधानचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिपाडा कुटुंबाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्यावेळी माजी आमदार ओमप्रकाशजी पोखरणा, डॉ. राजेंद्र पिपाडा, महावीर पिपाडा, सचिन शिंदे आदि उपस्थित होते. संपूर्ण देशभर 6 डिसेंबर हा दिवस बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो.यावेळी पुढे बोलताना डॉ. पिपाडा म्हणाले की, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा संदेश आजच्या पिढीसाठी एक आदर्शच आहे. बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत असून त्यांची शिकवण अनेक पिढ्यांसाठी आदर्शवत असणार आहे. सवर्ण, शूद्र, उच्च आणि नीच अशी सामाजिक दरी भ्रूण काढत शिक्षणाचा समान हक्क मिळवून देण्याचा कायदा बाबासाहेबांनी आणला.

देशाला त्यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे आज अनेक मागास आणि वंचित घटकतील मुलांना शिक्षणाचा हक्क मिळाला आहे. थोर समाजसुधारक म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यांनी भारतातील तळागाळातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी खूप प्रयत्न केले. मागासवर्गाच्या हितांसाठी ‘स्वतंत्र मंजूर पक्ष’ या पक्षाची स्थापना केली होती. सप्टेंबर 1947 मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणू डॉ. आंबेडकरांनी शपथ घेतली.

सामाजिक भेदभाव निर्माण करणाऱ्या मनूस्मृति या ग्रंथाचे त्यांनी जाहीररीत्या दहन केले. तसेच नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये दीनदलितांना प्रवेश मिळवा म्हणून सत्याग्रह केला. तसेच महाडच्या चवदार तळ्यावर पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला. अशा या महामानवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी वंदन करतो असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी उपस्थित माजी आमदार ओमप्रकाशजी पोखरणा, डॉ. राजेंद्र पिपाडा, महावीर पिपाडा, सचिन शिंदे आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button