Letest News
पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ... शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन जिल्हा कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात उत्साहाचा नवा संचार
अ.नगरराजकीय

अहिल्यानगरमध्येही ठाकरे गटाला खिंडार

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागली आहे. त्यामध्ये अहिल्यानगरचाही समावेश आहे. येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला आहे. उऱलेल्यांपैकी बहुतांश पदाधिकारी आता प्रवेश करणार आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

दोन दिवसांपूर्वी नगरमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी यासंदर्भात नगरमधील शिंदे सेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी चर्चा केली. त्यामध्ये ३० तारखेला प्रवेश करण्याचे ठरले. ठाकरे सेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, श्याम नळकांडे, सचिन शिंदे, संतोष गेनाप्पा, परेश लोखंडे, संग्राम कोतकर, बबलू शिंदे यांचा शिंदे सेनेत प्रवेश होणार असल्याचे समजल्यावर दानवे यांनी सोमवारी नगरला आले.

त्यांनी या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची हक्काची जागा राष्ट्रवादीला सोडल्याचा राग कार्यकर्त्यांना आहे, त्यामुळे पक्ष सोडण्यावर ते ठाम राहिले. नगर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, नगर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर हेही शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.अर्थातच यामागे येणाऱ्या स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकीचे गणित आहे.

विधानसभा निवडणुकीच्यावेळी ही जागा पूर्वीप्रमाणे शिवसेनेकडे घ्यावी, अशी पदाधिकाऱ्यांची मागणी होती. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. मात्र, वरिष्ठांनी ऐकले नाही. त्याचा रागही या पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात आहे. तेव्हा तुम्ही आमचे ऐकले नाही, आता तुमचे का ऐकावे, असे हे पदाधिकारी मध्यस्थी करण्यासाठी येणाऱ्यांना सांगत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button