Letest News
शिर्डीत भक्तिरसाचा महापर्व! साई–हरी नामाचा सार्वजनिक कीर्तन सोहळा ५०व्या वर्षात — शिर्डी पंढरपूरमय मतदानाच्या दिवशी शिर्डी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय-मतदान प्रक्रियेला अडथळे टाळण्यासाठी प्रशासन... प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पस... अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप...
अ.नगरराजकीय

तर याचा अर्थ तुम्ही कोणाशीच प्रामाणिक नाहीत फेरमतमोणीची मागणी म्हणजे रडीचा डाव खासदार लंके

खासदार लंके यांनी हंगे येथे आज बोलताना दिली. ते म्हणाले की, मॉक पोल घेतला, तरी माझा निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवर शंभर टक्के विश्वास आहे. या यंत्रणेमध्ये फेरफार, बदल होत नसतो. लोकसभेची निवडणूक ही देशाचे भवितव्य घडविणारी निवडणूक आहे.

sai nirman
जाहिरात

या यंत्रणा, मशिन मॅनेज होत असत्या, तर लोकांनी रात्रंदिवस समाजासाठी काम केले नसते. फक्त मशिन मॅनेज केले असते, असा टोलाही लंके यांनी लगावला. एकाही मतदान केंद्रावर गडबड आढळणार नाही. निवडणूक आयोगाची ही यंत्रणा आहे. प्रत्येक मशिन मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्याची तपासणी केली जाते.

मॉक पोल घेतला जातो. त्यानंतर ते मतदान मोजले जाते व त्यानंतरच प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू करण्यात येते. त्यामुळे कोठेही हेराफेरी होणार नाही. मग त्यावर चर्चा कशाला, असा सवाल लंके यांनी केला.

DN SPORTS

निवडणुकीच्या काळात यंत्रणा मॅनेज करायची आणि निवडणुकीला सामोरे जायचे, असे त्यांचे काम आहे. आता फेरमतमोणीची मागणी म्हणजे रडीचा डाव आहे. आपलं अपयश झाकण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे अशी प्रतिक्रियाही खा. नीलेश लंके यांनी दिली.लंके म्हणाले, ईव्हीएम मशिनबाबत वास्तविक आम्ही तक्रार करायला हवी होती. देशात तुमचे सरकार आणि तुम्हीच यंत्रणेवर अविश्वास दाखवत असाल, तर याचा अर्थ तुम्ही कोणाशीच प्रामाणिक नाहीत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button