Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरराजकीय

पारधी समाजासाठी दिवाळी विशेष उपक्रम पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा आगळा वेगळा दिवस

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यंदाची दिवाळी पारधी समाजासाठी एक आगळी वेगळी पद्धतिने साजरी केली. सोमवारी ते कामरगाव जवळील पारधी समाजाच्या पालावर जाऊन मिठाई आणि साडी चोळीचे वाटप केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावेळी पोलीस उपाधीक्षक गिरीश वमने, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, तसेच सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले उपस्थित होते. या उपक्रमामागील पुढाकार पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचाच होता.

सदर उपक्रमाचा उद्देश पारधी समाजातील मुलांना चांगले शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करणे आणि महिला व पुरुषांना रोजगाराची संधी उपलब्ध करून समाजाची प्रगती साधणे हा होता.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले,
“आदिवासी समाज मुख्य प्रवाहात आणायचा असेल तर या समाजाला प्रतिष्ठा मिळवणे आवश्यक आहे. मात्र अनेक ठिकाणी या समाजातील लोकांवर चुकीचे आरोप होत आहेत तसेच घरकुलांसाठी जागा मिळत नाही. त्यामुळे शासनाच्या प्रत्येक योजनेची माहिती आणि लाभ पोहोचवण्यात येणार आहेत.”

शासनाच्या दृष्टीने पारधी वस्त्यांवर CCTV कॅमेरे बसवण्याचे उपक्रम सुरू आहेत. कामरगाव येथील वस्तीत एका वर्षापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, आणि याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

या दिवाळीच्या उपक्रमामुळे पारधी समाजाच्या जीवनात समानता, सुरक्षा आणि सामाजिक प्रगतीची भावना वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

🌟 समाजातील प्रत्येक घटकाला संधी देत उज्ज्वल भविष्य घडवण्याची जबाबदारी प्रत्येकाच्या पायावर आहे, असे पोलीस अधीक्षक घार्गे यांनी प्रतिपादन केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button