Letest News
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे पोलीस ठाण्यातही लिंगपिसाट भोंदू खरातचा माज साक्षीदारांनाच दिली दमदाटी! भोंदू खरातचा जेलमधील मुक्काम वाढला-कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ
राजकीयशिर्डी

थकीत वीजबिलावर ५०% सवलत द्या- डॉ. राजेंद्र पिपाडा यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

शिर्डी : राज्यातील शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शेतीमालाचे अस्थिर दर, वाढता उत्पादन खर्च आणि वारंवार होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी थकीत शेतीपंप वीजबिलावरील व्याज माफ करावे तसेच पूर्वीप्रमाणे ५० टक्के सवलत लागू करावी, अशी मागणी भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


डॉ. पिपाडा यांनी राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या अडचणींचा सविस्तर आढावा मांडला. अनेक शेतकऱ्यांकडे वीजबिलांची मोठी थकबाकी आहे. मात्र, प्रलंबित वीजबिलावरील व्याज माफ केल्यास शेतकरी मूळ रक्कम भरण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे शासनालाही महसूल मिळेल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

kamlakar


यापूर्वी शासनाने राबविलेल्या वीजबिल माफी योजनेत ५० टक्के सवलत आणि संपूर्ण व्याज माफी देण्यात आली होती. त्या निर्णयाला शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर पुन्हा निर्णय घेतल्यास मोठ्या प्रमाणावर थकबाकी वसुली होण्याची शक्यता असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिर्डी विमानतळावर झालेल्या भेटीदरम्यान डॉ. पिपाडा यांनी हे निवेदन मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. आता शासन यावर काय भूमिका घेते, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button