
शिर्डी ( प्रतिनिधी)
शिर्डी येथे ३ व्यक्तींवर विनयभंगासारखा गुन्हा दाखल झाला असून त्यामुळे शिर्डीत मोठी खळबळ उडाली आहे. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे . पण सध्या येथे सातत्याने कायदा व सुव्यवस्थेत अशांतता निर्माण करण्याचे प्रकार घडत आहेत. शिर्डी मध्ये दुहेरी हत्याकांड, त्यानंतर गावठी कट्टे सापडणे, तसेच हाणामाऱ्या शिवीगाळ आदी अनेक प्रकरणे घडत आहेत.

शिर्डीतील भिकारी पकडून नेल्यानंतर अहिल्यानगर येथे त्यापैकी चार जण रुग्णालयात मयत झाल्याचे प्रकरणही मोठे गाजत आहे. असे सर्व एकामागे एक प्रकरण घडत असतानाच शिर्डीत एक भयंकर प्रकार उघडकीस आला असून त्या संदर्भात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्या संदर्भात शिर्डी पोलीस ठाण्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,
शिर्डी शहरातील कोते गल्ली मध्ये पाच एप्रिल 2025 रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान बाप्पू पांडुरंग ठाकरे, छाया बापू ठाकरे, व शिर्डीतील एस नाईन चॅनलचा सागर सिताराम सावकारे यांनी रस्त्याच्या कारणावरून विनाकारण शिवीगाळ करत पती घरी नसताना एका महिलेचे केस बापू पांडुरंग ठाकरे यांनी ओढले.
सागर सिताराम सावकारे यांनी या महिलेच्या हात धरून तिला ढकलून दिले.व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. वैभव ठाकरे यांनी चापटीने मारहाण करून शिवीगाळ केली. व तुम्हाला संपून टाकू अशी धमकी या महिलेला दिली. अशा आशयाची फिर्याद या पिडीत महिलेने शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 74 /333/ 352/ 351 दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत. मात्र अशा व्यक्तींवर शिर्डीत विनयभंगासारखा गुन्हा दाखल झाल्यामुळे शिर्डीत मोठी खळबळ उडाली आहे