Letest News
पोटनिवडणुकीत माध्यमांवर कडक नियम-जाहिरातींसाठी पूर्व मंजुरी अनिवार्य नाशिक प्रकरणात खळबळ! भोंदू बाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ – ‘५ नरबळी’चा धक्कादायक संशय शिर्डीतील ‘क्लासिक आइसक्रीम’ची जागतिक भरारीकडे वाटचाल-नूतन आइसक्रीम युनिटचे भव्य उद्घाटन   ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ  वाघचौरे यांना फसवण्याचा... सुपर ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट asp वाघचौरे यांना फसवण्याचा प्रयत्न फसला! ६,५०० रुपयांच्या लाचेप्रकरणी जिल्हा परिषद अभियंता जाळ्यात! ACB ची धडक कारवाई शिर्डीत ११५ वा श्रीरामनवमी उत्सव-लाखो साईभक्तांच्या स्वागतासाठी भव्य तयारी पूर्ण! खरातचा काळा खेळ उघड! शिर्डी पोलिसांची गुप्त मोहीम ठरली निर्णायक शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई श्रीरामनवमी उत्सवानिमित्त पालखी सोहळ्यांचे जल्लोषात स्वागत-संस्थानची सेवाभावाची परंपरा कायम
अ.नगरराजकीय

शिर्डीत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत प्रहारच्या बच्चू कडूंना पाठिंबा! आणखी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा- अमोल बानाईत

शिर्डी ( प्रतिनिधी) शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, दिव्यांगांना महिन्याला सहा हजार रुपये मिळावेत .आदी मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांनी उपोषण सुरू केले आहे.याच आंदोलनाला समर्थन म्हणून शिर्डी शहरात प्रहारच्या वतीने शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शिर्डी नगरपंचायत जवळील पाण्याचे टाकीवर चढून प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल बानाईत, युवक तालुका अध्यक्ष विजय काकडे ,शिर्डी शहर अध्यक्ष विकी मिसाळ आणि कार्यकर्त्यांनी शोले स्टाईल आंदोलन करत यावेळेस सरकारने तात्काळ बच्चुभाऊ कडू यांच्या मागण्यांची दखल घ्यावी. अन्यथा राज्यभर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला.

शेतकरी, दिव्यांग, अपंग यांचे दैवत श्री बच्चुभाऊ कडू गेल्या पाच दिवसापासून अमरावती या ठिकाणी उपोषणास बसलेले आहे. महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना मिळाला पाहिजे. हे मुद्दे घेऊन बच्चुभाऊ कडू गेल्या पाच दिवसापासून उपोषण करत आहे.

ते आंदोलन जेथे करत आहेत त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र मधून अनेक आमदार आणि अनेक पक्षातील खासदार अनेक लोकांचा बच्चू कडू यांना भेटून पाठिंबा देत आहेत . आश्वासन देऊनही शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही. शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे आणि त्यांचं मत खोटे बोलून सरकारने घेतलेला आहे.

चुकीच्या पद्धतीने दडपशाही पद्धतीने हे सरकार स्थापन केलेलं आहे . असे सांगत लवकरात लवकर सरकारने या ठिकाणी बच्चुभाऊ कडू यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी व त्यांच्या जीविताला काही कमी जास्त झालं तर 13 तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात अनोख्या आणि मोठ्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन उभारण्यात येईल.

असा इशारा देत सरकारला जाग येण्यासाठी आज आम्ही शिर्डी नगरपंचायत च्या पाण्याच्या टाकीवर चढून या ठिकाणी आंदोलन केलेले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भात लवकरात लवकर जर निर्णय घेतला नाही तर यापेक्षाही देखील मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन करण्यात येईल, सगळ्यांचा नाद करा पण शेतकऱ्याचा नाद करू नका. असा इशाराही अमोल बानाईत यांनी दिला आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button