
अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये केली होती. यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याचा ठराव महापालिकेत मांडण्यात आला.
अहमदनगर महापालिका प्रशासक सर्वसाधारण सभेकडून नामांतर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. महापालिकेनंतर आता जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दिला आहे.
मागील अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी केली जात होती. अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याची देखील मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर महानगरपालिकेने नामांतराचा ठराव मंजूर केला.