Letest News
निमगाव येथील पतसंस्थेच्या पैश्यांचा अपहर करणाऱ्या त्या संचालकांच्या प्रॉपर्टीवर बोजा चढवणार-सहकार खा... शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महसूल समाधान शिबिरात १३६ दाखल्यांचे वाटप नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उल्हासनगरच्या विजयचे शिर्डी येथून अपहरण वडिलांनी शिर्डी पोलीस स्टेशनला केला गुन्हा दाखल आर बी एल चौकात हाईट ब्यारिगेटला ट्रकची धडक सुदैवाने कोणास इजा नाही  आषाढी वारी सुरू असताना महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईन मध्ये मोरीचे घाण पाणी सोडल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल  साईभक्ताची सापडलेली पर्स संस्थान कर्मचारी यांनी केली परत संस्थान कडून त्या कर्मचारीचे सन्मान साई संस्थान मधील माजी सैनिकांची पडताळणी त्यात अनेक माजी सैनिक बोगस निष्पन्न प्रा.राम शिंदे यांच्या अहिल्यानगर दौऱ्याप्रसंगी सुरक्षा व राजशिष्टाचाराबाबत गंभीर त्रुटीसंदर्भात दोष... आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या संघर्षयात्रींचा उपजिल्हाधिकारी गिते यांच्या हस्ते गौरव
अ.नगरशिर्डी

शिर्डीतील ग्रामदैवते यांच्याबरोबरच हाजी अब्दुल बाबा यांची झोपडीहि  ग्रामस्थांकडे किंवा संस्थानं कडे वर्ग करण्यात यावीत

शिर्डी ( प्रतिनिधी)
शिर्डी शहरातील ग्रामदैवत असणारी सर्व मंदिरे यांच्याबरोबरच हाजी अब्दुल बाबांची झोपडी  ग्रामस्थांकडे किंवा श्री साईबाबा संस्थान कडे वर्ग करण्यात यावेत अशी मागणी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान शिर्डीचे कार्याध्यक्ष समीर रामचंद्र वीर यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिर्डी येथे 10 फेब्रुवारी 2025 रोजी ग्रामसभा संपन्न झाली. त्यामध्ये शिर्डी शहरातील ग्रामदैवत असणारी श्री गणपती मंदिर, श्री शनि महाराज मंदिर, श्री महादेव मंदिर, श्री हनुमान मंदिर आदी मंदिरे साई संस्थान कडे सध्या देखभालीसाठी असून ती पुरवत साई संस्थानाने ग्रामस्थांकडे वर्ग करावीत.

असा ठराव होऊन साई संस्थान कडे ग्रामस्थांच्या वतीने तशी मागणी करण्यात आली आहे. मात्र शिर्डीत हाजी अब्दुल बाबा यांची झोपडी असून त्यांची देखभाल खाजगी व्यक्ती करून तेथे मिळणारा देणगीरुपी निधी स्वतःसाठी वापरतात. त्यामुळे शिर्डी शहरातील  हि हाजी अब्दुल बाबा यांची झोपडी  ग्रामस्थांकडे किंवा श्री साईबाबा संस्थानकडे वर्ग करण्यात यावीत.

अशी समीर वीर यांची मागणी असून त्यासाठी राहाता तालुक्याचे आमदार नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजय विखे यांनी  विशेष लक्ष घालावे .अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री, व विधी आणि न्याय मंत्री यांना पाठवण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button