
शिर्डी प्रतिनिधी
ठाणे आणि व नागपूर पर्यंतचा प्रवास आठ तासात करणे सहजपणे शक्य होणार आहे तसेच ठाणे मुंबई परिसरातून शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांनाही या महामार्गामुळे आपल्या प्रवास जलद गतीने करणे शक्य होणार आहे त्यासोबतच शिर्डी अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतमाल सुलभतेने कमी कालावधीत मोठ्या बाजारपेठेत पोहोचवता येणार आहे
शेतकऱ्यांना उद्योजकांना व प्रवाशांना मुंबई महानगर प्रदेशात जाणे सोयस्कर होणार असून शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य विषयक विस्तारण्याच्या दृष्टीने हा महामार्ग मोठ्या फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे प्रथमच बोगद्यात वापरण्यात येणारा अग्निशमन यंत्रणा राज्यशास्त्राचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्ग हा अभियांत्रिक कौशल्यासह अनेक वैशिष्ट्ये आणि समृद्ध असा महामार्ग आहे
या महामार्गामुळे पर्यटन उद्योग शेतीमाला कमी वेळेत बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी फायदा होणार आहे या मार्गावरून आतापर्यंत अंदाजे दोन कोटी गाड्यांनी प्रवास करत सुखद रहदारीमुक्त सुलभ गतिमान प्रवासाचा अनुभव घेतला आहे या टप्प्यात पाच दुहेरी बोगदे आहेत
ह्या बोगद्यांची लांबी दहा पूर्णांक 73 किलोमीटर आहे दोन्ही मार्गे मिळून एकूण लांबी 31.46 किलोमीटर आहे त्यातील पॅकेज 14 येथील बोगदा आठ किलोमीटर लांबीचा सून हा महाराष्ट्रातील सर्वात लांब व रुंदीचा बोगदा आहे त्याचे आज लोकार्पण करण्यात आले आहे