Letest News
राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती?
राजकीयशिर्डी

थकीत वीजबिलावर ५०% सवलत द्या- डॉ. राजेंद्र पिपाडा यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

शिर्डी : राज्यातील शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शेतीमालाचे अस्थिर दर, वाढता उत्पादन खर्च आणि वारंवार होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी थकीत शेतीपंप वीजबिलावरील व्याज माफ करावे तसेच पूर्वीप्रमाणे ५० टक्के सवलत लागू करावी, अशी मागणी भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


डॉ. पिपाडा यांनी राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या अडचणींचा सविस्तर आढावा मांडला. अनेक शेतकऱ्यांकडे वीजबिलांची मोठी थकबाकी आहे. मात्र, प्रलंबित वीजबिलावरील व्याज माफ केल्यास शेतकरी मूळ रक्कम भरण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे शासनालाही महसूल मिळेल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

kamlakar


यापूर्वी शासनाने राबविलेल्या वीजबिल माफी योजनेत ५० टक्के सवलत आणि संपूर्ण व्याज माफी देण्यात आली होती. त्या निर्णयाला शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर पुन्हा निर्णय घेतल्यास मोठ्या प्रमाणावर थकबाकी वसुली होण्याची शक्यता असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिर्डी विमानतळावर झालेल्या भेटीदरम्यान डॉ. पिपाडा यांनी हे निवेदन मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. आता शासन यावर काय भूमिका घेते, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button