Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
अ.नगरशिर्डी

शिर्डीतील ग्रामदैवते यांच्याबरोबरच हाजी अब्दुल बाबा यांची झोपडीहि  ग्रामस्थांकडे किंवा संस्थानं कडे वर्ग करण्यात यावीत

शिर्डी ( प्रतिनिधी)
शिर्डी शहरातील ग्रामदैवत असणारी सर्व मंदिरे यांच्याबरोबरच हाजी अब्दुल बाबांची झोपडी  ग्रामस्थांकडे किंवा श्री साईबाबा संस्थान कडे वर्ग करण्यात यावेत अशी मागणी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान शिर्डीचे कार्याध्यक्ष समीर रामचंद्र वीर यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिर्डी येथे 10 फेब्रुवारी 2025 रोजी ग्रामसभा संपन्न झाली. त्यामध्ये शिर्डी शहरातील ग्रामदैवत असणारी श्री गणपती मंदिर, श्री शनि महाराज मंदिर, श्री महादेव मंदिर, श्री हनुमान मंदिर आदी मंदिरे साई संस्थान कडे सध्या देखभालीसाठी असून ती पुरवत साई संस्थानाने ग्रामस्थांकडे वर्ग करावीत.

असा ठराव होऊन साई संस्थान कडे ग्रामस्थांच्या वतीने तशी मागणी करण्यात आली आहे. मात्र शिर्डीत हाजी अब्दुल बाबा यांची झोपडी असून त्यांची देखभाल खाजगी व्यक्ती करून तेथे मिळणारा देणगीरुपी निधी स्वतःसाठी वापरतात. त्यामुळे शिर्डी शहरातील  हि हाजी अब्दुल बाबा यांची झोपडी  ग्रामस्थांकडे किंवा श्री साईबाबा संस्थानकडे वर्ग करण्यात यावीत.

अशी समीर वीर यांची मागणी असून त्यासाठी राहाता तालुक्याचे आमदार नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजय विखे यांनी  विशेष लक्ष घालावे .अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री, व विधी आणि न्याय मंत्री यांना पाठवण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button