Letest News
“द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू
अ.नगरराजकीय

शिर्डीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे यांना ‘समाज रत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

राहाता : येथील श्री बिरोबा महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने सालाबादप्रमाणे दिला जाणारा यंदाचा ‘समाज रत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, शिर्डी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच शिर्डी येथील महेश लोढा यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे यांनी आपल्या कार्यकाळात शिर्डी व परिसरातील अनेक सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. विविध गंभीर गुन्ह्यांची उकल करून गुन्हेगारांना जेरबंद करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे शिर्डी परिसरातील गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात आळा बसला असून, पोलीस खात्याची प्रतिमा जनमानसात अधिक उंचावली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


विशेष म्हणजे, अडचणीत सापडलेल्या नागरिकांनी — विशेषतः महिला भगिनींनी — कोणत्याही वेळी संपर्क साधल्यास तत्काळ प्रतिसाद देत मदत पोहोचविण्याची त्यांची कार्यशैली सर्वत्र कौतुकास्पद ठरली आहे. “सेवा, सुरक्षा आणि संवेदनशीलता” या तत्त्वांवर आधारित त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी मानले जात आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ट्रस्टतर्फे ‘समाज रत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


हा पुरस्कार सोहळा वै. ह.भ.प. सजन यशवंत सदाफळ व वै. भाऊसाहेब सजन सदाफळ यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या जगदगुरू संत तुकाराम मंदिर 15 चारी येथे गुरुवार दि. ५ मार्च २०२६ रोजी संत तुकाराम महाराज बीज निमित्त आयोजित करण्यात आला आहे.


यावेळी सकाळी १० ते १२ या वेळेत वैष्णव महाराज जाधव यांच्या हस्ते बीज कीर्तन सेवा संपन्न होणार असून, त्यानंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ‘समाज रत्न’ पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष व विधिज्ञ रामनाथ सदाफळ यांनी केले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button