Letest News
मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड राहता येथे बुलडोझर- मग वाळकीतील आरोपीबाबत काय? नागरिकांचा सवाल अब्दुल बाबा दरगाह साई संस्थानच्या ताब्यात घ्या हिंदू जनआक्रोश मोर्चात सागर बेग यांचा एल्गार गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या...
क्राईमशिर्डी

हत्या होऊनही आरोपी फरार, पोलिस गप्प! राहाता पोलिसांवर पाठीशी घालण्याचा आरोप-कायद्याचा वचक कुठे?

शिर्डी | प्रतिनिधी
“वेळेवर पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले असते, तर आज माझा भाऊ जिवंत असता!”
हा आक्रोश आहे सचिन स्थानराव गिढे या तरुणाच्या कुटुंबीयांचा, ज्याचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली आणि मृतदेह गोदावरी नदीत फेकून देण्यात आला.
या गंभीर प्रकरणात राहाता पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळेच आरोपींचे फावले, असा थेट आरोप आता पीडित कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणी मृताचा भाऊ अमोल स्थानराव यांनी सामाजिक नेते मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडे कडक शब्दांत निवेदन सादर करून न्यायासाठी हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
🟥 अपहरणाची माहिती असूनही ‘मिसिंग’ची नोंद!
घटना घडताच सचिन गिढे यांच्या पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन
➡️ पतीचे अपहरण झाल्याची स्पष्ट माहिती दिली
➡️ संशयित आरोपींची नावेही सांगितली
मात्र तरीही, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल न करता केवळ ‘मिसिंग’ची नोंद करून गंभीर दुर्लक्ष केले.
या हलगर्जीपणामुळे आरोपींना पुरावे नष्ट करण्यास व हत्या करण्यास वेळ मिळाला, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
🟥 हत्या होऊनही पोलिसांचा संथ तपास
10/12/2025 रोजी सचिन गिढे यांची हत्या झाल्याचे स्पष्ट असतानाही
➡️ 11/12/2025 रोजी उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल
➡️ तपास अपूर्ण असतानाही काही आरोपींना CR-20 अंतर्गत लाभ
➡️ मुख्य आरोपींपैकी प्रवीण नानासाहेब वाघमारे आजतागायत फरार
➡️ तरीही पोलिसांकडून अटक नाही
या साऱ्या बाबींमुळे आरोपींना पाठीशी घालण्याचा गंभीर संशय बळावत आहे.
🟥 “ही हत्या नव्हे, तर यंत्रणेचा खून!”
पीडित कुटुंबीयांचा आरोप आहे की,
ही घटना केवळ एका तरुणाची हत्या नसून
👉 पोलिस यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा बळी
👉 कायद्याच्या अंमलबजावणीतील अपयश
👉 गरीब कुटुंबाच्या न्यायाचा खून
आहे.
🟥 कुटुंबाच्या ठाम मागण्या
पीडित कुटुंबाकडून पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत —
🔴 सर्व आरोपींना तात्काळ अटक
🔴 फरार आरोपी प्रवीण वाघमारे यास त्वरित जेरबंद करणे
🔴 सर्व आरोपींवर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई
🔴 अमानुष हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा
🔴 अपहरण असूनही गुन्हा नोंद न करणाऱ्या व तपासात दिरंगाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई
🟥 सवाल जनतेचा : पोलिस कुणाच्या बाजूने?
या प्रकरणामुळे राहाता–शिर्डी परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
“पोलिस वेळेवर काम करत नाहीत, आरोपी मोकाट फिरतात आणि निरपराध मरतो”
असा रोखठोक सवाल आता जनतेकडून विचारला जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button