ऊसाचा ओव्हरलोड ट्रक पटली होवुन भीषण अपघात, १ ठार तर २ जण गंभीर जखमी

शिर्डी ( प्रतिनिधी)नगर मनमाड महामार्गावरील,कोल्हार येथील पूल मोडकळीस आल्याने या महामार्गावरील वाहतूक बाभळेश्वर – श्रीरामपूर नेवासा मार्गे,वळविण्यात आल्याने. श्रीरामपूर बाभळेश्वर मार्गावर, अनेक अवजड वाहनांची वाहतूक होत असून. यात ऊसाने ओव्हरलोड भरलेल ट्रकचा देखील समावेश असून. आज शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान,खंडाळा गावातील गणपती मंदिरा कडे जाणा-या वळणावर, एम एच १२ एच सी ९६६६ क्रमांकाचा ट्रक पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात उषा विघावे नावाच्या महिलेचा मृत्यू झाला असून दुचाकीवर जात असलेले,आकाश महाडिक अभिजित जखमीं झाले असून. जखमींवर सध्या लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरचा अपघात हा आरटीओ आणि पोलिसांसमोर ओव्हरलोड वाहतूक सुरू असतांनाही कारवाई न केल्यामुळे झाल्याचं बोललं जातं असून आता तरी प्रशासनाने ओव्हरलोड वाहतूकी संदर्भात ठोस पाऊले उचलावी .अशी मागणी केली जात आहे. या अपघाता संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.