Letest News
साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
अ.नगरक्राईम

वसंत देशमुख जिथे असतील त्यांना ताब्यात घ्या निवडणूक आयोगाने ही कडक कारवाई करावी चंद्रशेखर बावनकुळे

भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून जी काही कडक कारवाई वसंत देशमुख याच्यावर झाली पाहिजे, ती आम्ही करू.” असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी संगमनेरमधील धांदरपळ येथे झालेल्या सुजय विखे यांच्या एका कार्यक्रमात वसंत देशमुख यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यावर आता भाजपने कारवाईचे आदेश दिले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

“जयश्रीताई थोरात या माझ्या मुलीप्रमाणे आहेत, त्या आमच्या परिवारातील एक घटक आहेत. बाळासाहेब थोरात आणि आमच्यात कितीही राजकीत मतभेद असले तरीही राज्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांशी आमचे पारिवारिक संबंध आहेत. जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल वसंत देशमुखांवर निवडणूक आयोगाने कडक कारवाई केली पाहिजे. पोलिसांनीही त्यांच्यावर कडक कारवाई करत,

जिथे असतील तिथून त्यांना ताब्यात घेतले पाहिजे. कारण, जयश्री थोरात यांचा अपमान हा सहन करण्यासारखा नाही. भाजप पक्ष हा या बाबतीत पूर्णपणे जयश्री थोरात यांच्या पाठीशी उभा आहे.” असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली बाजू मांडली.

पुढे बावनकुळे म्हणाले की, “वादग्रस्त विधान वसंत देशमुखांनी केले. पण या घटनेचा गैरफायदा घेत तिथे काही काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षातील लोकांनी सुजय विखे पाटील यांच्यावर हल्ला केला. सुजय विखे पाटील यांच्यावर जो जीवघेणा हल्ला झाला, आम्ही त्याचाही निषेध करतो. या भ्याड हल्ल्यात जे कोणी दोषी आहेत, त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली पाहिजे.” अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.

तसेच ते पुढे म्हणाले की, “सुजय विखे पाटील यांचा काही दोष नसताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. व्यासपीठावर वसंत देशमुख यांनी केलेल्या विधानाचे सुजय विखे पाटलांनी त्याचे समर्थन कुठेच केले नाही, त्यांनीदेखील देशमुखांच्या विधानाचा कडक शब्दात निषेध केला आहे. त्यामुळे भाजप वसंत देशमुखांवर कडक कारवाई करण्याच्या भूमिकेत आहे.”

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button