Letest News
शिर्डी साई मंदिर सुरक्षेसाठी नवे प्रभारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे आदेश साईपरंपरेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व – मिलिंद (दादा) कोते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भक्तीचा महासागर उसळणार! शिरडी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज साईसेवेचा सुंदर नमुना-संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस भेट साईकृपेचा दुहेरी आनंद-ठाण्याच्या नार्वेकर कुटुंबीयांकडून ११ लाखांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण शिर्डीसाठी स्वतंत्र उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय-आता ‘दारूमुक्त शिर्डी’ची खरी परीक्षा! खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका
अ.नगरराजकीय

महावितरणचा अनागोंदी कारभार, ग्राहकांच्या मुळावर सामाजिक कार्यकर्ते शरद तांबे

राहुरी / प्रतिनिधी :  अहिल्यानगर जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कारणही तसेच आहे. वीज माणसांच्या मुलभूत गरजापैकी बनली आहे. मात्र महावितरणचा अनेकदा भोंगळ कारभार नेहमीच दिसला आहे वीजेचे बिल नेहमीप्रमाणे उशीरा येते व ग्राहकांना दंडाचा फटका बसतो आहे. यावर सामाजिक कार्यकर्ते शरद तांबे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


  महावितरणची आधीच उशिरा विज बिले त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहक आणि व्यावसायिकांना वितरित झाले मात्र बिले प्राप्त होताच दुसऱ्याच दिवशी त्यावर अंतिम दिनांक असल्याने विनाकारण ग्राहकांना दंडाचा भुर्दंड दंड भरावा लागत आहे.  
   गत महिन्याची वीज बिले महावितरण कंपनीकडून पाच दिवस उशिरा दिले लागोलग वीज देयकाचा अंतिम दिनांक असल्याने ग्राहकांना हा दंडाचा भुर्दंड नाहक  होताना दिसतोय.

नेहमीच अनेक ‌कारणे आणि जुजबी कारणे दाखवून ग्राहकांना लुबाडणाऱ्या महावितरण  कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या निष्काळजी पणामुळेच हा दंड वीजग्राहकांना विनाकारण भरावा लागत आला आहे. 

या उशीराच्या पाच दिवसांचा हिशेब केला तर यातून दंडाचे लाखो रुपये जमा होतात हा एक प्रकारचा ‌अतिरिक्त ‌चार्ज आहे का? असा प्रश्न प्रवरानगर येथील सामाजिक कार्यकर्ते शरद तांबे यांनी उपस्थित केला आहे. या प्रश्नी महावितरण प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारणार असल्याचे शरद तांबे यांनी सांगितले आहे. 

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button