Letest News
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप... राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप) सुनील निवृत्ती पाटील शिंदे यांचा प्रचंड दावा : “प्रभाग २ मध्ये नंदूभाऊंचा विजय ठरलेलाच… विरोधकांची ब... एआय बनावट वन्यप्राणी व्हिडिओवाल्यांना थेट जेल — एसपी सोमनाथ घार्गे यांची कडक सूचना”
अ.नगरशिर्डी

प्रवेशद्वाराजवळ पूजेचे साहित्य खरेदी केल्याचे बिल दाखवल्यानंतरच पूजेचे साहित्य मंदिरात नेण्यास परवानगी!

शिडी (प्रतिनिधी)- काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून समजल्या जाणाऱ्या साईनगरीत साईभक्तांना साई समाधी मंदिरात फुलं-हार व प्रसाद नेण्यास बंदी करण्यात आली होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मात्र गुरुवारी १२ जून 2025रोजी साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीने फुलं-हार व प्रसाद बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून भाविकांची लूट थांबवण्याकरिता
पूजेचे साहित्य खरेदी केल्याची पावती प्रवेशद्वारा जवळ दाखवल्यानंतरच साई भक्तांना फुलं हार, प्रसाद नेण्यास मंदिरात परवानगी मिळणार आहे. या निर्णयाचे साईभक्त व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.


कोरोना काळात साई मंदिरात फुलं-हार व प्रसाद बंदी केल्यानंतर दोन ते तीन वर्ष शिर्डीतील फुल विक्रेते व परिसरातील फुल उत्पादक यांना आर्थिक वर्षाचा मोठा सामना करावा लागला होता.
फुलहार, प्रसाद अनेक वर्षानंतर सुरू होताच काही महिन्यातच काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर बंदुकीच्या साह्याने हल्ला करून त्यांना ठार केले होते.

काश्मीर येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या विविध देश व राज्यातून भाविकांची सुरक्षाची काळजी घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने साई मंदिरात फुलं-हार व प्रसाद नेण्यास बंदी केली होती. त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या पुन्हा खचला होता.

तसेच शिर्डीतील छोटे व्यवसायिक देखील फुलहार, प्रसाद बंदीच्या निर्णयामुळे आर्थिक संकटात सापडले होते. साई मंदिरात फुलहार व प्रसाद नेण्यास परवानगी द्यावी याकरिता विखे यांनी देखील शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता. अखेर गुरुवारी १२ जून 2025 रोजी साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीने फुलहार व प्रसाद बंदीचा निर्णय उठवण्याचा निर्णय घेऊन भाविकांची पूजेच्या साहित्यापासून होणारी लूट थांबवण्याकरिता साई मंदिरात भाविकांना पूजेचे साहित्य घेऊन जाण्यापूर्वी ज्या दुकानात पूजेचे साहित्य खरेदी केले,

त्या दुकानाचे पूजेचे साहित्य खरेदी करण्याचे बिल मंदिर प्रवेशद्वाराजवळ दाखवल्यानंतरच साई समाधी मंदिरात त्या भाविकाला फुलहार व प्रसाद नेण्यास प्रवेश दिला जाईल असा निर्णय घेतला. साई भक्तांकडून जादा दराने पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदारांना या निर्णयाने चाप बसणार असून या निर्णयामुळे भाविकांची होणारी लूट थांबणार आहे. साई संस्थांनने प्रथमच इतिहासात हा निर्णय घेतल्याने या निर्णयाचे भाविकांनी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

शिर्डीतील काही दुकानदार भाविकांकडून फुल हार व प्रसाद व इतर पूजेचे साहित्य दर फलक पेक्षा जास्त दर घेऊन विकत असल्याच्या तक्रारी साई संस्थान कडे येत होत्या. भाविकांची लूट थांबवण्याकरिता साई समाधी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना पूजेचे साहित्य खरेदी केल्याचे बिल प्रवेशद्वाराजवळ दाखवल्यानंतरच पूजेचे साहित्य मंदिरात घेऊन जाता येईल अन्यथा जाता येणार नाही. या निर्णयामुळे भाविकांची होणारी लूट थांबणार आहे. असे साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी म्हटले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button