Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
क्राईमशिर्डी

दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल!

शिर्डी (प्रतिनिधी) दुसरे लग्न केल्याचा पतीला जाब विचारताच पतीने काठी व लाथा बुक्क्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली.अशी फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की,सौ. अर्चना प्रसाद कदम रा. निमगांववाडी ता. राहाता यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

आपल्या पतीने सुमारे सहा ते सात महिन्यापासुन दुसरे लग्न केले असुन त्यामुळे आमचे मध्ये भांडणे होत असुन त्या भांडणामुळे मी सुमारे दोन महिन्यापासुन मी माझी आई सुनित ज्ञानेदव वेताळ रा. शिक्रापुर ता. पुणे हीचे कडे राहण्यास आहे.


दिनांक 04/02/2025 रोजी मी माझे सासरी निमगांव येथे असतांना सायंकाळी 06/00 वा सुमारास माझे पती -प्रसाद गोरक्ष कदम यांनी दुस-या महिले सोबत मला लपवुन लग्न केल्याचे मला माझ्या सासु सास-यांकडुन समल्याने मी त्यांना त्या बाबत विचारले असता त्यांनी मला शिवीगाळ करुन लाथाबुक्कांनी व तसेच काठीने मारहाण केली.

तरी मी त्या दिवशी रात्रभर सासरीच थांबले व दुस-या दिवशी मी पोलीस स्टेशनला आले होते. त्यावेळी पोलीसांनी मला दवाखान्यात उपाचर कामी पाठवल्यावर मी ग्रामीण रुग्नालय राहाता येथे तपासणी केली होती. व त्या नंतर मी पुन्हा माझे पती व सासु सासरे यांचे मध्ये बदल होईल या आशेने पोलीस स्टेशला तक्रार न देता माझे सासरी गेले.

परंतु माझा नवरा व माझे मध्ये त्यांनी केलेल्या दुस-या लग्नाचे कारणा वरुन वारंवार भांडणे होत असल्याने मी दिनांक 20 मार्च 2025 रोजी माझे माहेरी वेताळ ता. शिक्रपुर जि. पुणे येथे गेले असुन तेव्हा पासुन मी माझे माहेरीच राहत आहे. माहेरी असतांना मला माझे दोन्ही मुले वारंवार फोन करुन आई तुझी आठवण येते असे म्हणत असल्याने मी परत दिनांक 31/05/2025 रोजी सायंकाळी 06/00 वा सुमारास सासरी निमगांव को-हाळे ता. राहाता येथे राहण्यास आले होते.

परंतु मी घरात प्रवेश करताच तेथे माझी सासु-सुनंदा गोरक्ष कदम, सासरे-गोरक्ष पंढरीनाथ कदम यांनी मी घरात गेल्या गेला मला म्हणाले की, ” तु घरात यायचे नाही. तु कशीकाय घरात आली हे आमचे घर आहे. तुझा नवरा येथे नाही. त्याने दुसरे लग्न केले आहे. तु तुझा नवरा आल्यावर काय ते बघ, येथे राहायचे नाही.

त्यावेळी मी मुलगी धनश्री कडे गेली तर मुलगी रडत होती व ती आई तु येथुन जावुन नको असे म्हणत होती. त्यावेळी माझे सासु सासरे माझे सोबत शाब्दीक वाद करुन शिवीगाळ करत होते त्यावेळी मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दोघांनी मला चापटीने मारहाण करुन धक्का बुक्की केली.

अशा आशयाची फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल झाले असून शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 613 /2025 नुसार भारतीय न्याय संहीता कलम 118 (एक) 115 (2,)352 /351 (2) ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button