Letest News
पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद
अ.नगरक्राईम

भेसळयुक्त कुल्फीचा भंडाफोड! १८५६ पॅकेट्स जप्त – नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच?

अहिल्यानगरमध्ये भेसळयुक्त कुल्फीचा भंडाफोड! १८५६ पॅकेट्स जप्त – नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच? 🔥
अहिल्यानगर : अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या धडक कारवाईत भेसळयुक्त कुल्फीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून तब्बल १८५६ पॅकेट्स कुल्फी जप्त करण्यात आली आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांच्या स्वास्थ्याशी थेट खेळ सुरू असल्याचा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे.
तपासणीदरम्यान जप्त करण्यात आलेली कुल्फी ही Amul कंपनीशी संबंधित असल्याचे समोर आले असून, त्यामध्ये नियमबाह्य पद्धतीने वनस्पती तेल आणि फॅटचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार दुग्धजन्य पदार्थांमध्ये अशा घटकांचा वापर करण्यास स्पष्ट बंदी असतानाही हा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
अन्नसुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नमुने तपासणीदरम्यान ही गंभीर बाब उघड झाली. यानंतर संबंधित कंपनीला तत्काळ खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे काही उत्पादक नियम पाळत असताना काहींकडून होत असलेल्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण उद्योगाची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्यास कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला असला, तरी अशा प्रकारांमुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर आळा बसणार का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
👉 नागरिकांच्या ताटात भेसळ पोहोचत असेल, तर ही केवळ कारवाई नाही तर संपूर्ण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह असल्याची भावना व्यक्त होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button