Letest News
अबब! साई संस्थान हादरले — संस्थानमधील ४७ कर्मचाऱ्यांनी साईबाबांच्या झोडीत हात घातला”“शेवटी साईबाबांच... पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ...

जिल्ह्यातील गुंड्यांचे सरदार विखे पितापुत्र विखे नावाचा विंचू जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना डसला

राहाता प्रतिनिधी
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात बोलल्याने त्यांनी त्यांच्या पळलेल्या गुंडांकडून माझ्यावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भविष्यात माझ्या जीवितास काही धोका झाल्यास याला सर्वस्वी राधाकृष्ण विखे आणि त्यांचा मुलगा सुजय विखे यांनाच जबाबदार धरण्यात यावे, असे लेखी निवेदन शिर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे इच्छुक उमेदवार डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून विधानसभा निवडणुकी आधी भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचे स्पष्ट होत आहे.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे सुपुत्र सुजय विखे यांच्या विरोधात बोलल्याने आणि शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे जाहीर केल्यानंतर मंत्री विखेंनी अधिकाऱ्यांना सांगून माझे पोलीस संरक्षण काढून घेतले, असा आरोप पिपाडा यांनी केला. पोलीस संरक्षण पुन्हा मिळण्याबाबत पिपाडा यांनी 14 ऑगस्टला पत्रही दिल्याचे ते म्हणाले.विखेंनी माझ्यावर हल्ला कारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 16 ऑगस्ट रोजी विखेंच्या लोणी जवळील चंद्रापूर गावात एकादशीच्या दिवशी माझ्या कुटुंबीयांच्या वतिने महाप्रसादाची पंगत होती. याला माझी पत्नी व कुटुंबीयांसह उपस्थित राहिलो. किर्तन सुरू असताना विखेंनी त्यांचे पाळीव गुंड यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी पाठवले. मात्र ग्रामस्थ व इतरांनी मध्यस्थी केल्याने मी वाचलो. विखे पिता-पुत्र इतक्या खालच्या पातळीवर राजकारण करत आहेत, असा आरोपही पिपाडा यांनी केला.शिर्डी मतदारसंघात विखेंच्या चार-चार पिढ्यांनी

राज्य केले, तरी विकासाचा कुठलाही मागमूस नाही.

बेरोजगारांच्या फौजा वाढत असून तरुणांच्या

हाताला काम नाही. सोसायटी त्यांच्याकडे,

ग्रामपंचायत त्यांच्याकडे, जिल्हा बँक यांच्याकडे, दूध

सोसायटी यांच्याकडे, साखर कारखाने, बाजार

समिती, मंत्रीपदं आणि खासदारकीही यांच्याकडे.

सत्तेचा वापर करून लोकांना धमकवायचे, जनतेला

गुलाम बनवायचे, विरोधकांच्या सभेला गेल्यास

त्याला ऊस उचलायचा नाही, बँकेकडून कर्ज मिळून

द्यायचे नाही हा प्रकार सगळ्यांनी पाहिला आहे, असा

आरोपही पिपाडा यांनी केला.

माझ्या विरोधात खोटे खटले दाखल करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. पण विखेंच्या झुंडशाही आणि गुंडगिरी विरोधात मी लढा सुरुच ठेवेल. सत्तेची दहशत मोडून काढली पाहिजे. विखेंनी मला डिवचण्याचा प्रयत्न करू नये, असेही राजेंद्र पिपाडा पुढे म्हणाले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button