Letest News
गर्भलिंग चाचणी रॅकेटमध्ये पुण्यातील तीन जण अटकेत -बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन पुरवठा प्रकरणात कारवाई निष्क्रिय अधिकारी नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने गाठला उच्चांक-राहता शहराची बिघडलेली प... “द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद”
राजकीयशिर्डी

आजचा दिवस जगा…” अजितदादांच्या जाण्याने आयुष्याच्या क्षणभंगुरतेची जाणीव — चेअरमन विठ्ठल पवार

“मृत्यू हे जीवनाचं अंतिम आणि अटल सत्य आहे… पण तरीही आपण ते रोज विसरतो,” अशा शब्दांत चेअरमन विठ्ठल पवार यांनी आयुष्याच्या क्षणभंगुरतेवर अत्यंत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असताना, आजचा दिवस जगा हा मूक पण खोल संदेश त्यांनी समाजाला दिला.
ते म्हणाले, “सकाळी हसत घराबाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी परत येईलच याची खात्री नसते. तरीही आपण उद्याच्या चिंतेत, भविष्यातील स्वप्नांत आणि अजून मिळवायचं आहे या धावपळीत आजचा क्षण गमावतो. आयुष्य हातातून निसटतं… आणि आपल्याला कळतही नाही.”

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याने ही जाणीव अधिक तीव्र झाली आहे. “आज दादा गेले, पण त्यांच्या जाण्याने फक्त एक नेता नाही, तर अनेकांच्या आयुष्याला दिशा देणारा आधार हरपला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो,” अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पित केली.
“शेवटी पैसा, पद, प्रतिष्ठा, सत्ता काहीच सोबत येत नाही. माणसासोबत जातं ते फक्त त्याने कमावलेलं प्रेम, केलेली माणुसकी आणि लोकांच्या मनात राहिलेली आठवण,” असे सांगताना त्यांचा आवाज शब्दांतूनही भरून आलेला जाणवत होता.
चेअरमन विठ्ठल पवार पुढे म्हणाले, “म्हणूनच राग, मत्सर, अहंकार मनात साठवू नका. माफ करा, जवळच्या माणसांशी बोला, मित्रांना वेळ द्या. कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही. भौतिक सुख ही मोहमाया आहे, पण समाधान, प्रेम आणि शांतता हीच खरी संपत्ती आहे.”


“उद्या काय होईल हे कुणालाच माहीत नाही. पण आज आपल्या हातात आहे. म्हणून आजचा दिवस जगा, मनापासून जगा, प्रामाणिकपणे जगा. जे आज आपल्या सोबत आहेत, त्यांना आपलं प्रेम आजच दाखवा,” असा भावनिक साद त्यांनी समाजाला घातला.
शेवटी त्यांनी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत, “राम कृष्ण हरी…” असे म्हणत अजितदादांना अंतिम आदरांजली अर्पित केली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button