Letest News
कामाच्या शोधात आलेल्या तरुणावर शिर्डीत रक्तरंजित हल्ला-पेरूच्या कारणावरून डोक्यात फळी घालून ठार मारण... EXCLUSIVE: भोंदू ‘कॅप्टन’चा आणखी एक कारनामा? साई संस्थानशी संबंधित कर्मचाऱ्याची संशयास्पद आत्महत्या भोंदू लिंगपिसाट अशोक खरातचा काळा कारभार उघड — कोट्यवधींच्या जमीन हडपगुन्हा दाखल-दोघे ताब्यात दोघे फर... साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य...
शिर्डी

वादळी पावसाचा तडाखा,एक गायीसह तीन मेंढ्या ठार

कोपरगाव तालुक्यात अवकाळीने थैमान घातले असून काल दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने बक्तरपूर परीसरात वीज पडून एक गायीसह तीन मेंढ्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.एका बाजूला उष्णता आहे तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस कोसळत आहे.दरम्यान हा अवकाळीचा जोर राज्यात आणखी राज्यातील विविध भागात पुढील आठवडाभर म्हणजे १८ मे पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.कोपरगाव तालुक्याच्या संवत्सरसह पूर्व भागाला चांगले झोडपले असून विजेचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्यामुळे संवत्सर,कोकमठाण या ठिकाणी अनेक नागरिकांच्या घराचे पत्रे उडून गेले असून काही ठिकाणी व्यापारी गाळे उडून मोठे नुकसान झाले आहे.

kamlakar

तर काही ठिकाणी मोठ मोठे वृक्ष विजेच्या तारांवर पडल्यामुळे वीज प्रवाह देखील खंडित झाला होता.तर काल दि.१४ मे रोजी दुपारी झालेल्या पावसाने बक्तरपूर शिवारात पडलेल्या विजेमुळे एक गाय व तीन मेंढ्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.या मेंढ्या अन्य भागातील असल्याची माहिती आहे.या शिवाय चासनळी येथील बाळासाहेब देवराम चांदगुडे यांच्या वस्तीचे पत्रे उडून गेले असून त्यांच्या प्रपंच रस्त्यावर आला आहे.

दरम्यान मागील एक महिन्यापासून उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना झालेल्या पावसामुळे तात्पुरता थंडावा मिळाला असला तरी काही नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले असल्याचे व काही मेंढ्या आणि गायींचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान घटनास्थळी बक्तरपूर येथील सरपंच मुक्ताबाई नागरे,ग्रामसेवक श्री.तडवी,तलाठी डी.बी.विधाते,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद कराडे आदींनी भेट दिली असून घटनेचा पंचनामा केला आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button