Letest News
शिर्डीत भक्तिरसाचा महापर्व! साई–हरी नामाचा सार्वजनिक कीर्तन सोहळा ५०व्या वर्षात — शिर्डी पंढरपूरमय मतदानाच्या दिवशी शिर्डी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय-मतदान प्रक्रियेला अडथळे टाळण्यासाठी प्रशासन... प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पस... अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप...
अ.नगरक्राईम

maharashtra news:-महंत रामगिरी महाराजांच्या जीवितास धोका? शासनाने झेड प्लेस सुरक्षा देण्याची गरज इम्तियाज जलील 

Mahant Ramgiri Maharaj's life threatened? Imtiaz Jalil on the need for government to provide Z Place security

शिर्डी प्रतिनिधी 

sai nirman
जाहिरात

महंत रामगिरी महाराजांचा जीव धोक्यात असल्याचा इशारा देत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारने त्यांना झेड प्लस सिक्युसिटी देण्याचे आवाहन केले. हे आम्ही नाही तर ज्यांच्या सांगण्यावरून तुम्ही मुस्लिम धर्म आणि धर्मगुरूंबद्दल बोलले तेच लोक तुमच्या जिवाशी खेळायला मागेपुढे पाहणार नाही आणि आमचे नाव पुढे करतील, असे माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

DN SPORTS

kamlakar

सत्तेसाठी हे लोक काहीही करू शकतात, असे जलील म्हणाले. एकूणच जलील यांच्या इशाऱ्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. रामगिरी महाराजांविरुद्ध ५८ एफआयआर दाखल होऊनही पोलिसांनी कारवाई केली नाही. मुख्यमंत्री उलट बोलतात की रामगिरी महाराजांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही.

त्यामुळे आम्ही सरकारला ५ दिवसांचा वेळ रामगिरी महाराजांवर कारवाई करण्यासाठी देत आहोत. सहाव्या दिवशी आम्ही मुंबईकडे कूच करू, राज्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी गाड्या तयार करून ठेवा. मुंबईला जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना संविधान भेट देऊ. पोलिसांना त्यांनी जेव्हा पदाची शपथ घेतली त्या शपथेची प्रत देऊ, असे जलील म्हणाले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत जलील म्हणाले, की रामगिरी महाराजांनी आता अलर्ट राहावे. थोडेही खुट्ट झाले तरी पहावे, की आपल्या जिवाला काही धोका तर नाही. आम्ही त्यांच्या जवळही जाणार नाही. तर तेच लोक असतील ज्यांच्या सांगण्यावरून त्यांनी वक्तव्य केले, असे जलील म्हणाले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button