Letest News
शिर्डीत भक्तिरसाचा महापर्व! साई–हरी नामाचा सार्वजनिक कीर्तन सोहळा ५०व्या वर्षात — शिर्डी पंढरपूरमय मतदानाच्या दिवशी शिर्डी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय-मतदान प्रक्रियेला अडथळे टाळण्यासाठी प्रशासन... प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पस... अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप...
अ.नगरराजकीय

तालुका पातळीवर कृषी प्रदर्शन भरविण्याची गरज – कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शिर्डी, (प्रतिनिधी) शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी स्थानिक युवकांनी एकत्र येत तालुका पातळीवर कृषी प्रदर्शन भरविण्याची गरज आहे, अशा प्रदर्शनांना शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.अकोले येथे आयोजित कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव शिंदे, द्राक्ष बागायतदार संघटनेचे कैलासराव भोसले, आबासाहेब थोरात, कपिल पवार, पाणी फाऊंडेशनचे अविनाश पोळ, कळस कृषी प्रदर्शन समितीचे सागर वाकचौरे, संदीप वाकचौरे, नामदेव मिसाळ आदी उपस्थित होते.


कृषीमंत्री श्री.कोकाटे म्हणाले, आतापर्यंत कृषी अवजारांची प्रदर्शने पाहिली आहेत. आज प्रथमच प्रत्यक्ष पीकांच्या शेतीसह असलेले प्रदर्शन पहात आहे. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून तरूणांना शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याचे ज्ञान प्राप्त होते. आज महाराष्ट्रात एका पीकांचे वेगवेगळे २०० प्रकारांच्या वाणांचे संशोधन झाले आहे. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाला पाहिजे यावर शासनाचा भर आहे. योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आली पाहिजे यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.


तरूणांना शेती क्षेत्राकडे वळविण्यासाठी कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक खत व बियाणे न वापरता, प्रमाणित केलेली खते व बियाणे अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी केली पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.
शेतकऱ्यांनी नकारात्मक होऊन खचून जाऊ नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


कार्यक्रमानंतर ,कृषीमंत्र्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट देत पिकांच्या नवनवीन वाणांची माहिती जाणून घेतली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button