Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
क्राईमशिर्डी

शिर्डीतील त्या हॉटेलचे अतिक्रमण पाडण्याचे लवकरच आदेश देण्यात येतील व कारवाई होईल –अ-नगरचे निवासी जिल्हाधिकारी यांचे तोंडी व लेखी आश्वासन

शिर्डी (प्रतिनिधी)शिर्डीत बेकायदेशीर केलेले हॉटेल शिर्डी पार्क इन मिनी पंजाब रेस्टॉरंट या हॉटेलचे अनाधिकृत बांधकाम पाडण्या संदर्भात त्वरित कार्यवाही केली जाईल .असे तोंडी व लेखी आश्वासन अहिल्यानगर जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिल्यामुळे या मागणीसाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 18 मार्च 2025 पासून आमरण उपोषण करण्यात येणार होते. मात्र ते निवासी जिल्हाधिकारी यांच्या या आश्वासनामुळे 31 मार्च 2025 पर्यंत स्थगित करण्यात आले

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

असून जर 31 मार्च 2025 पर्यंत हे अतिक्रमण पाडले गेले नाही व या अतिक्रमण करणाऱ्या या हॉटेल मालकाला अप्रत्यक्ष पाठीशी घालणारे शिर्डी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्यावर कारवाई झाली नाही तर एक एप्रिल 2025 पासून आपण कोणतीही पूर्व सूचना न देता अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शिर्डीचे सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते , दैनिक साई दर्शनचे संपादक जितेश मनोहरलाल लोकचंदानी यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिले आहे.


त्यांनी या पत्रकात पुढे म्हटले आहे की,
आपल्या महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात अनाधिकृत केलेले व शासनाच्या जागेवर केलेले बांधकाम पाडण्याचे समस्त राज्यातील महानगर पालिका, नगरपालिका, नगरपंचायत सह ग्रामपंचायत  तसेच संबंधित शासकीय अधिकारी यांना लेखी सूचना दिल्याने  संपूर्ण राज्यात अतिक्रमण मोहीम सुरु केलेली आहे.


मात्र शिर्डी नगर परिषदेच्या हद्दीत पिंपळवाडी रोडवर हॉटेल शिर्डी पार्क इन् मिनी पंजाब रेस्टोरंट हे अनधिकृतपणे नगर परिषदेची कुठलीही परवानगी न घेता बांधकाम केलेले आहे. त्या हॉटेल मालकाला नगर परिषदेने सन २०१९ साली ३ वेळेस अनधिकृत बांधकाम पाडण्याची लेखी नोटीस दिलेली होती.  तरीही त्या हॉटेल मालकाने ते अतिक्रमण काढले नाही. त्यावेळी मी ते अतिक्रमण  पाडावे म्हणून शिर्डी नगर परिषदेच्या समोर  ५ दिवस आमरण उपोषण केले होते. 

त्यावेळी हेच श्री. सतीश दिघे मुख्याधिकारी होते. माझे उपोषण सोडवतांना नगर परिषदेने मला लेखी दिले होते कि, सदर हॉटेल मालकाचा दावा न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाचे आदेशाने पुढील कारवाई करण्यात येईल आणि तो दावा २०२४ मध्ये न्यायालयाने फेटाळून लावला असता मी दिनांक १७/०२/२०२५ रोजी आपणांसह संबंधित विभागांना ते अतिक्रमण पाडावे म्हणून अर्ज दिला होता. तरी ते अतिक्रमण निघाले नाही.  तेव्हा मी हे अतिक्रमण काढले नाहीतर जलसंपदा मंत्री . राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या शिर्डी  कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असा अर्ज केला होता .

त्यावर मला लोणी पोलीस स्टेशनचा फोन आला. त्यांनी उपोषणाबाबत मला विचारले आणि मला संबंधित नगर परिषदेचे अधिकारी यांच्या सोबत चर्चा करा. असे सांगितल्याने मी दिनांक २८/०२/२०२५ व दिनांक ०१/०३/२०२५  रोजी शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री सतीश दिघे साहेबांशी त्या अतिक्रमणाबाबत चर्चा केली असता त्यांनी मला लेखी कळवले की ,संबंधित अतिक्रमणाबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

परंतु कधी निर्णय घेण्यात येईल हे सांगितले नाही. महाराष्ट्र राज्यातील तसेच शिर्डी शहरातील अनेक ठिकाणाचे अनाधिकृतपणे केलेले अतिक्रमण काढत असतांना या हॉटेल मालकावर नगर परिषद मेहेरबान का?   किंवा जाणीवपूर्वक  त्या हॉटेल मालकाला काही अवधी द्यायचा म्हणजे तो पुन्हा न्यायालयात जाऊन दावा दाखल करेल.


हे अतिक्रमण पाडू नये यासाठी शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचे संबंधित हॉटेल मालकाशी  काही आर्थिक व्यवहार झालेले असल्याची मला शंका झालेली आहे .कारण आताही तेच श्री. सतीश दिघे मुख्याधिकारी आहेत. तेव्हा सदरील अतिक्रमण काढण्याचे आदेशित करून संबंधित मुख्याधिकारी यांच्या कारकीर्द बाबत खातेनिहाय  चौकशी करून कारवाई करण्यात यावी. व त्या बाबत माहिती मला लेखी स्वरूपात अवगत करावी तसेच  माझी मागणी होती की

ते अतिक्रमण पाडावे. ती  मागणी मान्य झाली नसल्याने येत्या १८ तारखेला मा. जिल्हाधिकारी सो आहिल्यानगर यांच्या कार्यालया समोर मी उपोषणास बसणार असा इशारा सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते जितेश लोकचंदानी यांनी दिला होता. दरम्यान या त्यांच्या निवेदन व इशाऱ्याची दखल घेऊन अहिल्यानगर जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी जितेश लोकचंदानी यांच्याशी यासंदर्भात चर्चा करून लवकरच हे अतिक्रमण काढण्यासाठी कारवाई करण्यात येईल.

व तसे संबंधितांना आदेश देण्यात येतील .असे तोंडी व लेखी आश्वासन दिल्यामुळे हे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असून जर ते 31 मार्च 2025 पर्यंत पाडण्यात आले नाही व संबंधित अतिक्रमण धारकांना पाठीशी घालणारे अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर एक मार्च 2025 पासून अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परत आमरण उपोषणास आपण बसणार असल्याचे यावेळी जितेश मनोहरलाल लोकचंदानी यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button