Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
शिर्डी

अनेक हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये मोफत साधे ,स्वच्छ पाणी देण्याऐवजी बाटलीबंद पाण्याची अप्रत्यक्षपणे केली जाते सक्ती!

शिर्डी (प्रतिनिधी)
सध्या बाटलीबंद पाण्याचा जमाना आल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.इतर शहराप्रमाणे शिर्डीतही काही हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर आपल्यासमोर बाटलीबंद पाणी दिले जाते. खरं तर टेबलवर एक साधं व स्वच्छ पाणी जग आणि ग्लास अशी सोय करणे आवश्यक आहे. तसा नियम आहे. परंतु अधिक पैसे मिळवण्यासाठी विनाकारण बाटली बंद पाणी घेण्याची शक्ती जणू अप्रत्यक्षपणे अश्या हॉटेलमध्ये केली जात असल्याचे चित्र अनेक ठिकाणी ‌येथे पाहायला मिळते. प्रत्येक हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये प्यायचं साधं पाणी ग्राहकांना देणे बंधनकारक आहे आणि ते दिले नाही तर त्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करता येते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

असे असतानाही अनेक हॉटेल रेस्टॉरंट मध्ये साधे पाणी न देता बाटलीबंद पाणी टेबलवर ठेवून ते अप्रत्यक्षपणे ग्राहकांना खरेदी करण्याची जणू सक्तीच होत असल्याचे चित्र दिसत असून त्यावर औषध प्रशासन कारवाई करणार का? असा संवाल करत आठवड्यातून एकदा तरी अन्न व औषध प्रशासनाने येथे पथके पाठवून अशा हॉटेलवर छापे टाकावेत व ग्राहकांना बाटलीबंद पाणी विक्री करून होणारी लूट थांबवावी. अशी मागणी शिर्डी नगरपरिषदेचे नगरसेवक सुरेश काळू आरणे यांनी केली आहे.

kamlakar


सुरेश आरणे यांनी म्हटले आहे की, बाटलीबंद पाणी खरेदी केले तर पैसे जातात तसेच पाणी पिल्यानंतरही ही रिकामी बाटली कचरा ठरते. या रिकाम्या बाटली मुळे प्रदूषण वाढते. पुण्यामध्ये अशी सक्ती हॉटेल रेस्टॉरंट मध्ये होऊ नये म्हणून गोखले इन्स्टिट्यूट मधील सेंटर ऑफ सस्टेनेबल या सेंटरकडून मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्लास्टिक ची बाटली करताना रासायनिक पदार्थ वापरले जातात. त्याचे लिंचिंग होते. प्लास्टिकचे केवळ दोन ते तीन वेळा रिसायकलिंग होते. नंतर ते इतके कमकुवत होते की त्याचे काहीच करता येत नाही. ते कचरा म्हणून पर्यावरणात राहते. त्याचे विघटन होत नाही. पण तुकडे होत राहतात .ते सगळीकडे माती नदी समुद्र यातून आपल्या अन्नसाखळीत प्रवेश करतात. त्यामुळे हा सर्व प्रकार बंद व्हावा म्हणून साधे व स्वच्छ पाणी हॉटेल रेस्टॉरंट मधून जग मधून देणे महत्त्वाचे आहे. आता अनेक ठिकाणी बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ पाणी मोफत मिळते.

मग त्याचप्रमाणे हॉटेल रेस्टॉरंट मधून ते मिळावे. तसा अन्न औषध प्रशासनाचा नियम आहे .मात्र हा नियम डावलून पैशासाठी बाटलीबंद पाणी जाणीवपूर्वक विक्रीसाठी ठेवले जाते. ग्राहक हॉटेलमध्ये आल्यानंतर बाहेर जात नाही. त्यामुळे प्रत्येक हॉटेल रेस्टॉरंट मध्ये येथे स्वच्छ मोफत पिण्याचे पाणी सुद्धा मिळेल असा फलक लावावा. जर असे नसेल तर अशा हॉटेल रेस्टॉरंट वर कारवाई व्हावी अशी मागणी सुरेश काळू आरणे यांनी केली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button