Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
अ.नगरशिर्डी

साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेमार्फत “वृक्ष प्रसाद योजना” औपचारिकपणे सुरु

शिर्डी – निसर्ग संवर्धन आणि भक्ती यांचे सुंदर समन्वय साधत शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेमार्फत “वृक्ष प्रसाद योजना” दि. १० जुलै २०२५ पासून औपचारिकपणे सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत इच्छुक साईभक्तांना प्रसादस्वरूप निंबवृक्षाची रोपे वितरित केली जात आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

सह्याद्री देवराईचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेते श्री सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाचे स्वागत महाराष्ट्रातील विविध प्रमुख मंदिरे करत असून, श्री साईबाबा संस्थान शिर्डीनेही यामध्ये पुढाकार घेतला आहे.

साई सत्चरित्रात उल्लेख केल्यानुसार श्री साईबाबांनी निंबवृक्षाला अत्यंत पवित्र स्थान मानले असून, “या निंबवृक्षाखाली माझ्या गुरूंचे स्थान आहे,” असे त्यांनी सांगितले होते. त्याच भक्तिपूर्ण संदर्भातून पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ श्रीमती मंगला वराडे, मुख्य लेखाधिकारी, श्रीमती प्रज्ञा महांडुळे, प्रशासकीय अधिकारी आणि श्री अनिल भणगे, कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

वृक्ष म्हणजेच जीवनदायी ऑक्सिजनचा स्रोत, अन्नाचा आधार आणि पर्यावरणाचा रक्षक. त्यामुळे या “वृक्ष प्रसाद योजना”च्या माध्यमातून भक्तांनी निसर्गसेवेतही सहभाग घ्यावा, असे आवाहन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी केले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button