Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
अ.नगरराजकीय

शिंदेचा एन्काऊंटर केला. दुसऱ्या शिंदेंचा जनता एन्काऊंटर करेल पोलीस इतके लेचेपेचे असतील तर फडणवीसांनी राजीनामा द्यायला हवा राऊत

एकाचं एन्काऊंटर झाला, आता दुसऱ्या शिंदेंचा जनता एन्काऊंटर करेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या एन्काऊंटरबाबत बोलताना संजय राऊत यांनी हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असल्याचं म्हटलं.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

तसंच या प्रकरणात मोठे मासे वाचवायचे आहेत, ज्यांना वाचवायचं आहे ते भाजपशी संबंधित आहेत.बदलापूरमध्ये हे संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली होती. संपूर्ण जनता आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, त्याला फाशी व्हावी या मागणीसाठी रस्त्यावर उतरली होती. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, बदलापूरमधील जनतेने रेल्वे बंद पाडली होती, रस्ते बदं केले होते. आरोपीला आमच्या ताब्यात द्या,

kamlakar

आम्ही त्याला शिक्षा देऊ, फासावर लटकवू असं म्हणत त्याला आमच्याकडे सोपवण्याची मागणी केली होती. पण त्यावेळी मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी महाराष्ट्र कायदेशीर राज्य असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं आश्वासन दिलं होतं, असंही संजय राऊत म्हणाले.पोलीस व्हॅनमध्ये बसलेला बुरखा घातलेला आणि बेड्यांनी जखडलेला गुन्हेगार पळून कसा जाईल,

तो पोलिसांच्या कमरेवरील पिस्तूल कसं काढू शकतो असा सवाल करत संजय राऊत यांनी आमचे पोलीस इतके लेचेपेचे असतील तर फडणवीसांनी राजीनामा द्यायला हवा, असं म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात जे वातावरण निर्माण केलं आहे, त्यावरुन लक्ष हटवणयासाठी हे एन्काऊंटर केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button