shirdi news : हरित उर्जा निर्मीती क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर करणारे देशातील साईबाबा संस्थान,शिर्डी हे मोठे तीर्थक्षेत्र असेल :- कार्यकारी अधिकारी
Saibaba Sansthan, Shirdi will be a major pilgrimage site in the country, which will use such a large amount in the field of green energy generation:- Executive Officer

श्री साईबाबा संस्थानने सुपा येथे कार्यान्वीत केलेल्या “पवनचक्की”तून तयार झालेली पवन ऊर्जा कॅप्टिव्ह कन्झमशन द्वारे माहे जानेवारी-२०२४ पासून संस्थानचे नवीन दर्शन रांग व मंदिर परिसरात वापरात आणली असून माहे जुलै-२०२४ अखेर सात महिन्यात रु.१ कोटी ७४ लाख १९ हजार ६५९/- रुपयांची बचत झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
श्री साईबाबा संस्थानच्या तत्कालीन व्यवस्थापन समितीचे मान्यतेने सन २००७ मध्ये सुपा येथे “पवनचक्की” प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पातून तयार होणारी उर्जा महाराष्ट्र राज्य वीज मंडळास रु.२.५२/-पर यूनिट दराने देणेत येत होती. तीच ऊर्जा आता संस्थानचे नवीन दर्शन रांग व मंदिर परिसरात माहे जानेवारी २०२४ ते जुलै २०२४ अखेर वापरत आणल्याने विजेचा वापर २२ लाख ४१ हजार ४२६ युनिटस झाला, त्यापैकी अंदाजे १५.६ लाख युनिटस साईबाबा संस्थानचे स्वत:च्या पवनचक्कीतून तयार झालेल्या पवन ऊर्जा कॅप्टिव्ह कन्झमशन द्वारे वापरात घेतली.
याचा प्रती यूनिट अंदाजे रु.१०/-संस्थानला आर्थिक फायदा झाला आहे. हा वापर जानेवारी २०२४ पासून सुरु झाला आहे. हरित उर्जा निर्मीती क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर करणारे देशातील साईबाबा संस्थान,शिर्डी हे मोठे तीर्थक्षेत्र असेल. ही पवन ऊर्जा संस्थानचे नवीन दर्शन रांग व मंदिर परिसरात कॅप्टिव्ह कन्झमशन द्वारे वापरात आणण्यासाठी श्री साईबाबा संस्थान मा.तदर्थ समिती(Ad-hoc),अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा अहमदनगर, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ,
अहमदनगर, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता किशोर साहेबराव गवळी यांनी विशेष पाठपुरावा केला तसेच पवन ऊर्जेचा कॅप्टिव्ह कन्झमशन द्वारे वीज वापरात आणण्याचा प्रकल्प Ignisense Ecoenergy Company(Pune) चे तात्रिक सल्लागार अरोह कुलकर्णी पुणे, पूनम ज्ञानदेव चौधरी, रा. पोहेगाव यांचे मार्गदर्शनाने
ओयासीस ईनर्जी सोल्यूशन,मुंबई यांचेकडून पूर्ण करून या योजनेला मूर्त रूप आणले. संस्थानचा सध्याचा एकूण वीजेचा वापर विचारात घेऊन पूर्ण क्षमतेने वीज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रुप टॉप सोलर सिस्टीम व “पवनचक्की” उर्जा प्रकल्पात अधिकतम वाढ करण्याचा संस्थानचा मानस असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.