Letest News
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे पोलीस ठाण्यातही लिंगपिसाट भोंदू खरातचा माज साक्षीदारांनाच दिली दमदाटी! भोंदू खरातचा जेलमधील मुक्काम वाढला-कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ
राजकीयशिर्डी

आंबेडकर नगरातील अतिक्रमणग्रस्तांना हक्काची जागा मिळाली-भावनिक क्षणात ‘लॉकेट सोहळा’“साहेबांनी फक्त घरं नाही दिली-तर जगण्याचा आधार दिला” – सुरेश आरणे

आंबेडकर नगर भागातील अतिक्रमणग्रस्त नागरिकांना अखेर त्यांच्या हक्काची जागा मिळाली. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या झोपड्यांवर बुलडोझर चालवला गेला तेव्हा अनेकांनी विखे पाटील कुटुंबावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
मात्र, त्या वेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेला शब्द — “गोरगरिबांना हक्काची जागा त्यांच्या नावावर करून देऊ” — आज खरा उतरला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


💎 शब्दपूर्तीचा सोहळा: चांदीच्या लॉकेटने ‘कृतज्ञतेचा क्षण’!

पट्टी वाटपाच्या कार्यक्रमात आज भावनिक दृश्य पाहायला मिळाले.
माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी सहा महिन्यांपूर्वी दिलेला शब्द पाळत,
पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांचे फोटो असलेले चांदीचे लॉकेट स्वतः डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते गळ्यात परिधान केले.
कार्यक्रमात उपस्थित हजारो नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्या क्षणाला साक्षी दिली.


🙏 “साहेबांनी फक्त घरं नाही दिली, तर जगण्याचा आधार दिला” – सुरेश आरणे

या वेळी बोलताना माजी नगरसेवक सुरेश आरणे म्हणाले,
“महाराष्ट्रात जिथे जिथे अतिक्रमण आहे, ते कधीतरी हटवावेच लागेल. पण त्याच वेळी त्या कुटुंबांचे पुनर्वसन करणेही गरजेचे आहे.
जेव्हा आंबेडकर नगर व नाला रोड भागातील अतिक्रमण काढण्याचा निर्णय झाला, तेव्हा अनेकांच्या डोक्यावर छप्परच उरले नव्हते.
त्यावेळी आमची बैठक घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांनी मार्ग दाखवला.
त्यांच्या प्रयत्नामुळे आज गोरगरिबांना हक्काची पट्टी मिळाली.”


🌟 विखे पाटील कुटुंबाची सामाजिक बांधिलकी पुन्हा अधोरेखित

हा उपक्रम म्हणजे फक्त घरवाटप नव्हे, तर विखे पाटील कुटुंबाच्या शब्दाला दिलेले खरे रूप आहे.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेला शब्द पाळून, गरीबांच्या डोळ्यात पुन्हा आशेचा किरण निर्माण केला.
हक्काच्या जागेचा दाखला मिळाल्यानंतर नागरिकांनी विखे पाटील कुटुंबाचे “जयकार” करत “साहेबांनी आमचं आयुष्य उभारलं” अशी प्रतिक्रिया दिली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button