Letest News
मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ... शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन जिल्हा कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात उत्साहाचा नवा संचार शिर्डी शहरातील समाजसेवक आणि साईभक्त जावेद भाई सय्यद यांचे दुःखद निधन शिर्डीच्या भवितव्यावर चिंतनाची गरज-राजकारण बाजूला ठेवून चिंतन बैठक घ्या” — प्रमोद गोंदकर
क्राईमशिर्डी

साईबाबा संस्थान ही आपली जहागिरी नाही गावाच्या विरोधात जाऊ नका सुभाष कोतकर

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी सध्या हवेमध्ये दिसतात .त्यांना वाटतं श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट ही आपली जहांगीरच आहे .असं वाटतं पण ध्यानात ठेवा हे एक फक्त संस्थान आहे जस गावामध्ये एखाद्या मंदिरावर ट्रस्ट बॉडी असते त्या पद्धतीचा श्री साईबाबा संस्थान याच्यावर पण ट्रस्ट बॉडी नेमली जाते

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

गावामध्ये एखादं मंदिर असतं ते मंदिर किंवा ट्रस्ट बॉडी गावाचा मालक होऊ शकत नाही किंवा गावापेक्षा एखाद मंदिर मोठ असू शकत नाही त्याच पद्धतीने श्री साईबाबा संस्थान हे गावांमध्ये आहे श्री साईबाबा संस्थान मध्ये गाव नाही हे पहिले श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी आणि तेथील अधिकाऱ्यांनी ध्यानात ठेवावे कुठलाही निर्णय घेतानी गावाला विश्वासात घेऊनच तो निर्णय श्री साईबाबा संस्थान अमलात आणू शकतात

शिर्डीचा जर इतिहास पाहिला तर आजपर्यंत श्री साईबाबा संस्थान मध्ये गावातील लोकच ट्रस्ट बॉडी मध्ये होते आणि काम पाहत होते हे विसरून चालणार नाही कारण हा सर्व कारभार श्री साईबाबा असतानी श्रीराम नवमी उत्सव दसरा जेवढे पण उत्सव श्री साईबाबांच्या मंदिरात होतात त्यामध्ये गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग असतो हा इतिहास आहे

आणि श्री साईबाबा चरित्रामध्ये पण उल्लेख आहे हे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी ध्यानात ठेवावे श्री साईबाबा पासून आणि श्री साईबाबा संस्थाना पासून गावकऱ्यांना तुम्ही वेगळं पाडू शकत नाही हे ध्यानात राहू द्या नाहीतर इथे खूप अधिकारी आले आणि गेले ज्यांनी गावकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली ते जास्त काळ टिकले नाही हे ध्यानात ठेवावे

गावकरी तो राव काय करी हे म्हनं खरी आहे हे मुख्य कार्य कार्यकारी साहेबांनी विसरू नये आणि तुम्ही एक शासनाने नेमून दिलेले श्री साईबाबा संस्थानच्या देखभालीसाठी नेमलेले एक प्रशासकीय अधिकारी आहात म्हणजे तुम्ही मालक झाले असे समजू नका कुठलाही निर्णय घेताना तुम्हाला शंभर वेळेस विचार करावा लागेल

जे तुमच्या अधिकारात येतात तेच निर्णय तुम्ही घ्या गावाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करू नका .सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो श्री साईबाबा तुम्हाला चांगली बुद्धी देवो. हीच अपेक्षा सुभाष शामराव कोतकर यांनी या पत्रात म्हटले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button