Letest News
गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम सावधान! घरगुती गॅस हॉटेलमध्ये वापरल्यास कारवाई शिर्डीत ५ ठिकाणी धाड श्री साई विसावा मंदिराचा ४ था वर्धापन दिन आज उत्साहात-काकड आरती-दत्तात्रेय हवन- भजन संध्या व महाप्रस...
राजकीयशिर्डी

परिवर्तनाच्या प्रवासातील प्रत्येक सहकाऱ्याचे मनःपूर्वक आभार – सौ. जयश्री विष्णू थोरात यांचे भावनिक निवेदन

शिर्डी, दि.–
नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारयात्रेला आज मतदानाची सांगता झाली असताना, महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. जयश्री विष्णू थोरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांप्रति आणि नागरिकांप्रति मनापासून कृतज्ञता व्यक्त करणारे भावनिक निवेदन जारी केले.

sai nirman
जाहिरात

“या संपूर्ण प्रचार काळात माझ्यासोबत घरोघरी फिरत, खांद्याला खांदा लावून या परिवर्तनाच्या प्रवासात सहभागी झालात, त्या प्रत्येक साथीदाराचे मनःपूर्वक आभार,” अशा शब्दांत सौ. थोरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांप्रति विशेष प्रेम व्यक्त केले. मागील काही आठवड्यांपासून त्यांनी प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाची दिशा जाणून घेतली होती. या संपूर्ण प्रवासात त्यांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि जनतेचा सहभाग हेच त्यांच्या उत्साहाचे खरे बळ असल्याचे त्या म्हणाल्या.

आजच्या मतदानानंतर सौ. जयश्री थोरात यांनी नागरिकांना विश्वास दिला की, “निकाल काहीही असो, लोकसेवेचा माझा संकल्प आणि प्रामाणिकपणा तसाच कायम राहील.” जनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे परिवर्तनाचा मार्ग अधिक दृढ झाल्याचेही त्या म्हणाल्या.

DN SPORTS

प्रचारादरम्यान महिलांनी, युवकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आणि सर्व समाजघटकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. त्या पुढे म्हणाल्या, “शिर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी, स्वच्छ-सुरक्षित आणि सुसंस्कृत शहरासाठी मी सदैव तत्पर राहीन.”

निवेदनाच्या शेवटी सौ. थोरात यांनी सर्वांना पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद देत आश्वासन दिले की, जनतेचा विश्वास हीच त्यांची खरी जमेची बाजू आहे आणि भविष्यातही त्या त्याच निष्ठेने सार्वजनिक जीवनात कार्यरत राहतील.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button