Letest News
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे पोलीस ठाण्यातही लिंगपिसाट भोंदू खरातचा माज साक्षीदारांनाच दिली दमदाटी! भोंदू खरातचा जेलमधील मुक्काम वाढला-कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ
राजकीयशिर्डी

“मंत्रालयात पीएन कार्यक्रम करतो, आयोग फक्त स्टँप मारतो!” – थोरातांची टीका तुफान मतमोजणी पुढे ढकलली… दोष मात्र कायम! मतदार याद्यांवरील प्रश्न पुन्हा ऐरणीवर

अहिल्यानगर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता नवा वळण लागलं आहे. मंगळवारी मतदान पार पडत असताना काही ठिकाणी मतदान आणि मतमोजणी पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, नागपूर खंडपीठानं मतमोजणीची तारीख थेट 21 डिसेंबर निश्चित करताच राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ माजला आहे. या सगळ्या परिस्थितीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर थेट आणि तुफान हल्ला चढवला.

sai nirman
जाहिरात

“निवडणूक आयोग सत्तेचा गुलाम झालाय!” – थोरातांचा स्फोटक आरोप

थोरात म्हणाले, “निवडणूक आयोगातील अधिकारी हे उच्च दर्जाचे आयएएस आहेत. त्यांनी शेकडो निवडणुका पाहिल्या आहेत… मग असा गोंधळ कसा होऊ शकतो? मंत्रालयातील एखाद्या पीएननं कार्यक्रम बनवला आणि आयोगानं त्यावर शिक्कामोर्तब केलं! आयोगाला कोणाचं तरी बंधन आहे. आता निवडणूक आयोग सत्तेचा गुलाम झालाय — हा आरोप अगदी खरा आहे.”
थोरातांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे.

DN SPORTS

मतदार याद्यांमधील दोषावर थोरातांचा थेट सवाल

मतमोजणी पुढे ढकलण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. पण यावर थोरातांनी पलटवार करत म्हणाले, “मुख्यमंत्री स्वतःवरचं बालट झाकण्यासाठी भूमिका घेत आहेत. अनेक वेळा मतदार याद्यांमधील गंभीर दोष दाखवूनही ते दुरुस्त होत नाहीत. तहसीलदार म्हणतात अधिकार नाहीत… म्हणजे स्पष्टच सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप आहे.”


निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्हे… राज्यातील राजकारण तापलं

न्यायालयाचा निर्णय, आयोगाची भूमिका, याद्यांतील दोष, आणि सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप—या सगळ्यांनी राज्यातील निवडणूक प्रक्रियेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. थोरातांच्या या प्रखर टीकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसतायत.

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button