
दीपक केसरकर यांनी एक अजब विधान केलं आहे. वाईटातून चांगल घडायचं असेल म्हणून अपघात झाला असावा असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. दीपक केसरकरांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि महायुती सरकार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
जाहिरात
DN SPORTS
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे पत्रकारांनी असं केसरकरांना विचारण्यात आलं असता दीपक केसरकर म्हणाले,
“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हा अपघात आहे. त्याच पद्धतीने ते घेतलं पाहिजे. कदाचित वाईटातून काही चांगल घडायचं असेल म्हणूनही हा अपघात झाला असेल. अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्यानुसार पुढील कारवाईही केली जाईल”.