Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
अ.नगरराजकीय

भारतीय हवामान खात्याचा इशारा-अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २२ ते २६ ऑक्टोंबर ‘यलो अलर्ट’

अहिल्यानगर, दि. २३ – भारतीय हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २२ ते २६ ऑक्टोंबर २०२५ दरम्यान ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात जोरदार वारे, मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, या काळात सुरक्षिततेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावे, असे सुचवले आहे.

sai nirman
जाहिरात

🌊 नद्यांच्या विसर्गात वाढ; पूरस्थितीचा धोका

धरणातून पाण्याचा वाढलेला विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांनी घ्यावी खबरदारी

DN SPORTS

पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे वाहणाऱ्या नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
सध्या विसर्गाचे आकडे असे आहेत:

भिमा नदी (दौंड पूल) – २,७१७ क्युसेक

गोदावरी नदी (नांदूर मध्यमेश्वर धरण) – १,६१४ क्युसेक

जायकवाडी धरण – ३,१४४ क्युसेक

मुळा धरण – ५,०० क्युसेक

kamlakar

घोड धरण – १,०० क्युसेक

सीना धरण – १,०३० क्युसेक

हंगा नदी (विसापूर धरण) – १८६ क्युसेक

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पूर किंवा धोकादायक परिस्थितीत ताबडतोब सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.


⚡ सुरक्षिततेसाठी प्रशासनाचे निर्देश

विजा, वादळ, पावसाच्या वेळी खबरदारी घ्या; धोके टाळा

मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागी उभे राहू नये.

वीजेच्या संपर्कात येऊ नये; ट्रॅक्टर्स, मोटारसायकल, धातूच्या वस्तूंपासून दूर राहावे.

होर्डिंग्ज किंवा जखमी/अस्थिर इमारतीजवळ राहू नये.

विजेच्या वेळी मोकळ्या जागेत असल्यास गुडघ्यावर बसून कान झाकावे, डोके गुडघ्यांमध्ये झाकावे, जमिनीशी कमीतकमी संपर्क ठेवावा.

नदी, ओढे, धरण आणि पूल परिसरात जाऊ नये; सेल्फी किंवा धोकादायक ठिकाणी फोटो घेऊ नयेत.

जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक १०७७ असून संपर्क क्रमांक ०२४१-२३२३८४४ / २३५६९४० उपलब्ध आहेत.


🏔️ अतिरिक्त खबरदारी

भूस्खलन, दरडी कोसळणे, घाट रस्त्याचे धोके; जनावरांचे सुरक्षित स्थलांतर

अतिवृष्टीमुळे भूस्खलन व दरडी कोसळण्याची शक्यता वाढते. डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

घाट रस्त्याने प्रवास शक्यतो टाळावा.

जुनाट/मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये.

जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे.

सर्व नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे, आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन केले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button