Letest News
पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ... शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन जिल्हा कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात उत्साहाचा नवा संचार
क्राईमशिर्डी

कालिका नगर येथील एस एस फायबरच्या कारखान्याला लागली आग 

शिर्डीतील कालिकानगर परिसरातील एसएसएस डोअर फायबर या गोडाऊनला आज (19 ऑगस्ट) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गोडाऊनमधील लॅमिनेशन पेपर, पेपर कटिंग मशीन आणि इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झालंय.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यामुळे जवळपास 40 लाखांच्या नुकसानीची माहिती कारखान्याचे मालक नवनाथ जाधव यांनी दिली. घटनास्थळी अग्निशमन दलानं तत्काळ दाखल होऊन आग विझवली. सध्या नुकसानीचं मूल्यांकन सुरू असून, अधिक तपासासाठी स्थानिक अधिकारी घटनास्थळी आहेत.

एसएसएस डोअर फायबर गोडाऊनला आग लागल्याचं समजताच शिर्डी साईबाबा संस्थान, शिर्डी नगरपंचायत आणि राहाता नगरपंचायत यांच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. तातडीनं केलेल्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आणि मोठा अनर्थ टळला. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लायवूड आणि साहित्य साठवलेलं असल्यामुळे आग अधिक भडकण्याचा धोका होता,

मात्र अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या कामगिरीमुळे आगीचा लोन रोखता आला. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या दुर्घटनेमुळे जाधव यांचं मोठं नुकसान झालं आहे हा कारखाना अगदी भरवस्तीत आहे आगीचे लोन जास्त प्रमाणात होते

त्याठिकाणी तात्काळ अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या आणि आग आटोक्यात आणली म्हणून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही आणि दरवाजे बनवण्याचे लिक्विडचे वास संपूर्ण परिसरात येते त्यामुळे तेथील रहिवासी ह्या वासाने ट्रस्ट झालेले आहेत

भर लोक वस्तीत ह्या दरवाज्यांचे कारखान्यास परवानगी दिली कोणी कि विना परवानगीनेच याठिकाणी हा कारखाना थाटला आहे याची चौकशी होऊन संबंधित मालकावर गुन्हा दाखल होऊन हा कारखाना तेथून हलवावे अशी मागणी कालिका नगर येथील रहिवासी यांनी केली आहे 

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button