
शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डीतील अनधिकृतपणे केलेले हॉटेल इमारत अतिक्रमण काढण्यासाठी उपोषणाला बसणारे जितेश लोकचंदानी यांच्या रास्त मागणीला पाठिंबा म्हणून त्यांच्या समवेत भारतीय लहुजी सेना व अण्णाभाऊ साठे नगरातील सर्व रहिवाशी आमरण उपोषणास बसणार असल्याचे पत्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान शिर्डीचे कार्याध्यक्ष समीर रामचंद्र वीर व अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवासी यांनी अप्पर जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी व शिर्डी नगर परिषद यांना दिले आहे .
या पत्रात म्हटले आहे की,
शिर्डी येथे पिंपळवाडी रोड लगत असलेल्या हॉटेल साई स्पर्श व मिनी पंजाब रेस्टॉरंट इमारतीचे अनधिकृत पणे मोठे अतिक्रमण करून बांधकाम झालेले आहे. हे बांधकाम पाडावे म्हणून अनेकदा संबंधित विभागाला जितेश लोकचंदानी यांनी अर्ज केलेले असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
शिर्डी नगरपरिषद या अतिक्रमणांवर कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे ना विलाजाने जितेश लोकचंदानी हे या हॉटेलचे अनधिकृत बांधकाम केलेले अतिक्रमण पाडावे. म्हणून आमरण उपोषण करणार असून या उपोषणाला पाठिंबा म्हणूनभारतीय लहुजी सेना व अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवासी त्यांच्या समवेत उपोषणाला बसणार आहोत. याची आपण कृपया नोंद घ्या
असे निवेदन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री समीर रामचंद्र वीर ,शिर्डी.जिल्हा अहिल्यानगर यांनी शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी यांना दिले आहे.