

विकास समृद्धी हे उद्धव ठाकरेचे काम नाही. विरोधकांना शिव्या घालणे अन चांगल्या कामात विघ्न आणण्याचे काम उद्धव ठाकरे करत असल्याची घणाघात टीका भाजपा खासदार नारायण राणे यांनी शिर्डीत केलीय. पुढच्या निवडणूकी पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्षा राहणार नाही असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी यावेळी केलाय.
भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी आज श्रीरामनवमी निमित्ताने सहपत्नीक शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आहे. साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतलाय. विधायक सामाजिक विकास कामांची विचार सारणी उद्धव ठाकरे यांची नाही. 39 वर्षा मी उद्धव ठाकरे बरोबर कायम केलेय. बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी पक्षा होता. साहेब गेले आणि शिवसेना संपली असल्याचही नारायण राणे म्हणाले आहे.
संजय राऊत सकाळी उठल्यावर घरा बाहेर मीडियाला बोलून दुकाना चालवतो. संजय राऊतने आपले कर्तव्य सांगावे देशासाठी राज्यासाठी आणि स्वतःचा गावासाठी काय योगदान आहे. संजय राऊतचा कुठल्याही भाष्याला मी उत्तर देणार नाही. संजय राऊताला मूर्ख माणूस समजत असल्याचही राणे यावेळी म्हणाले आहे. संजय राऊतचे प्रत्येक वक्तव्य वाद निर्माण करणारे आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना बद्दल केलेल्या व्यक्तव्यावर बोलतांना , कोकाटे यांनी शेतकऱ्यांना बदल व्यक्त केले मत चुकीचे आहे. असेही राणे म्हणाले आहे.