Letest News
श्री साई निर्माण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी अनोख्या उपक्रमातून साजरी केली ' रक्षाबंधन ' भाजपाचे माजी जिल्हा पदाधिकारी बंडू शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा महिला विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल मुख्यमंत्री सहाय्यता निधी अनेक रुग्णांसाठी ठरला आशेचा किरण ! लाभार्थी रुग्णांनी व्यक्त केल्या कृतज्ञ... नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर येथे उत्साहात स्वागत ! रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे... शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांची बदली त्याच्या जागी अमोल भारती यांची वर्णी साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीन... शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुध्द मकोका कायदयान्वये कारवाई नगर मनमाड रोडवरील हॉटेल मध्ये खंडणीसाठी गुंड्यांचा हैदोस  शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करा...
अ.नगरशिर्डी

शिक्षक विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यात अपयशी ठरत असेल तर त्यांचा पन्नास टक्के पगार कमी करावा” केसरकर

शिर्डी (अहिल्यानगर) – “कोकणात उद्योग येण्याला आपला विरोध नाही. मात्र, कोकणातील बागायती क्षेत्राची आणि मासेमारी उद्योगाची हानी न करणाऱ्या उद्योगांची गरज आहे. ही आपली भूमिका कायम आहे”, असे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केला आहे. उद्योगमंत्री असताना उदय सामंत जगभर फिरत असल्यानं त्यांना जगाचा अनुभव आहे. त्यात उपरोधीकपणा काहीच नसल्याची सावरासावर दीपक केसरकर यांनी करत वादावर पडदा टाकला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

माजी मंत्री दीपक केसरकर यांनी 26 डिसेंबर रोजी शिर्डीत येत साईबाबांच्या धुपाआरतीला हजेरी लावलीय. साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलतांना केसरकर म्हणाले, ” मंत्री केले नाही म्हणून मी नाराज नाही. कोकण आणि मतदारसंघाच्या विकासासाठी लक्ष केंद्रीत केलं आहे.

आपण शालेय शिक्षण मंत्री असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मुंबईत मराठी भवन निर्माण करण्याचा निर्णय घेतला . आपण घेतलेले निर्णय पुढे नेण्याबाबतची भूमिका नवीन शिक्षण मंत्री ठरवतील. मात्र, केरळच्या धर्तीवर मुलांमध्ये स्कील डेव्हलपमेंट प्रोग्रॅम राबवण्याची गरज आहे,” असे केसरकर यांनी सांगितले. “शिक्षक विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यात अपयशी ठरत असेल तर त्यांचा पन्नास टक्के पगार कमी करावा,” अशी अपेक्षा केसरकरांनी व्यक्त केली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button