Letest News
पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ... शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन जिल्हा कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात उत्साहाचा नवा संचार
अ.नगरशिर्डी

थकलेल्या क्षणी जर कोणी निःस्वार्थ भावाने पाय दाबले तर तीच खरी भक्ती जिल्हा उप माहिती अधिकारी सुरेश पाटील

शिर्डी ( प्रतिनिधी )- मुंबई ते शिर्डी पायी चालत आलेल्या साईबाबांच्या पालखीत पदयात्रींच्या थकलेल्या पायांना दिलेली ही सेवा म्हणजे एक प्रकारे भक्तीच आहे,देव कुठे भेटतो तर अशा थकलेल्या चेहऱ्यांमध्ये, सेवेसाठी समर्पित झालेल्या हातांमध्ये, आणि निःस्वार्थ भावनेत असे मत शिर्डी येथील जिल्हा उप माहिती कार्यालयाचे अधिकारी सुरेश पाटील यांनी व्यक्त केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

दरम्यान राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील श्री साई मंदिर ट्रस्टच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षांपासून दर रामनवमी उत्सवाला मुंबईहून येणाऱ्या पालखीतील पदयात्री यांच्यासाठी मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात येते.यासाठी वीस जनांची टीम सात दिवस अहोरात्र सेवा देण्याचे काम करत असते.

रामनवमी उत्सवाच्या आठ दिवस अगोदर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथून या उपक्रमाची सुरवात करण्यात येते.चालत असलेल्या पदयात्रींच्या पायाची तेल लावून मालिश करणे,पायाला जखम ,फोड आले असेल त्याठिकाणी डेटॉल,बेटाडाइन औषधाने स्वच्छ करून मलम पट्टी करणे आदीबरोबर प्राथमिक उपचार सेवा अखंडपणे सुरु असून यंदाच्या ११४ व्या रामनवमी उत्सवात साई मंदिर कोऱ्हाळे ट्रस्टचे २५ वे वर्ष होते.

या पंचवीस वर्षात त्यांनी साधारणपणे अडीच लाखाहून अधिक पदयात्री साईभक्तांची पायाची मालिश करून देण्याची सेवा केली आहे. यंदाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने पंचवीस वर्ष अनमोल सेवा देणाऱ्या सेवेकरींचा शिर्डी जिल्हा उप माहिती कार्यालयाचे अधिकारी सुरेश पाटील यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी जेष्ठ पत्रकार रामकृष्ण लोंढे,बाळासाहेब सोनवणे,दिलीप खरात, राजेश जाधव, धनंजय वाकचौरे आदींसह साई सेवक पालखीचे मोहन खरपे, साई मंदिर कोऱ्हाळे चे वसंत खरात,हेमाताई घोडे,कु नंदिनी घोडे आदीसह साईभक्त उपस्तित होते.यावेळी साई मंदिर कोऱ्हाळे ट्रस्टचे संचालक सदानंद घोडे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना म्हटले कि,

पदयात्रा म्हणजे केवळ एक धार्मिक किंवा सामाजिक प्रवास नसतो, तर तो मन, शरीर आणि आत्म्याचा परस्पर जोडणारा एक अद्वितीय प्रवास असतो.अशा पदयात्रेत शेकडो किलोमीटरचा प्रवास करताना पाय थकतात, शरीर थकते, पण मन मात्र निर्धाराने भरलेले असते. या थकव्याच्या क्षणी जर कोणीतरी प्रेमाने, आपुलकीने पाय दाबून सेवा केली,

तर त्या सेवेमुळे केवळ शरीर नव्हे तर अंतःकरणही हलके होते.थकलेल्या पायांना आधार देणं, दुखलेल्या मनाला समजून घेणं हाच खरा मानवतेचा संदेश असल्याचे त्यांनी सांगितले.तर पत्रकार श्री लोंढे म्हणाले कि आजच्या धावपळीच्या युगात अशी सेवा करणारे हात फारच दुर्मीळ झाले आहेत.

म्हणूनच या अनुभवाने मला हे शिकवलं की आपणही शक्य तितक्या लोकांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे.कधीकधी एखाद्याच्या थकलेल्या पायांवर हात ठेवून दिलेली उब त्याच्या प्रवासाला नवी ऊर्जा देऊ शकते.असे सांगत पुढील वर्षी आम्ही देखील या शेवट सहभागी होणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button