कोपरगाव शहरातील डॉकटर मयूर तिरमखे यांनी ब्राम्हणगाव येथील महिला अर्चना माधव शिंगाडे हीचेवर चुकीची शस्त्रक्रिया केल्याने त्यात तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत आज विविध दलीत संघटनांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यापासून मोर्चाचे आयोजन करत कोपरगाव शहर परिसर दणाणून सोडला असून आरोपी डॉक्टरवर कारवाई करावी व मयत महिलेच्या कुटुंबास न्याय द्यावा अशी मागणी करत कोपरगाव तहसीलचे नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,ब्राम्हणगाव येथील दलीत महिला अर्चना शिंगाडे व तिचा पती माधव शिंगाडे यांना या आधी तीन मुली आहेत.मयत महिला अर्चना शिंगाडे हि
तीन महिन्याच्या गरोदर असताना तिच्यावर कोपरगाव येथील डॉ.मयूर तिरमखे यांच्याकडे उपचार चालू होते.दि.२२ मे २०२५ रोजी नियमित तपासणीसाठी सदर महिलेला नेले असता डॉक्टरांनी सोनोग्राफि केली होती.
त्यानंतर त्यांनी तिच्या गर्भाची वाढ व्यवस्थींत झाली नाही त्यासाठी गर्भवाढिसाठी २० दिवसाच्या गोळया दिल्या होत्या.सदर गोळ्या घेतल्या नंतर दि २४ मे २०२५ रोजी तिला रक्तस्त्राव चालु होऊन तिच्या पोटात दुखत होते.दि.२५ मे रोजी सकाळी पुन्हा संबधित डॉक्टरकडे तपासणीस नेले असता त्यांनी सोनोग्राफी केली होती.
त्यानंतर त्यांनी गर्भाच्या भोवती रक्ताच्या गाठी तयार झाल्याचे व गर्भ खराब झाला असल्याचे सांगुण तो गर्भ काढावा लागेल असे सांगितले होते.गर्भ खराब झाल्यामुळे मयत महिलेच्या पतीने त्यास सहमती दिली होती.मात्र तो गर्भ कांढल्यानंतर तिच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्या होत्या त्याच बरोबर रक्तस्राव देखील होत असल्याची माहिती दिली आहे.
तथापि डॉ.मयूर तीरमखे यांनी लक्ष दिले नाही असा त्यांचा आरोप आहे.त्यांनी इलाज करण्यास हलगर्जीपणा केला आम्ही वारंवार सांगून ऐकले नाही व त्यांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या दिवशी दि.२६ मे २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता सोनोग्राफी पुन्हा केली होती.सदर वैद्यकीय अहवाल डॉ.तिरमखे यांना दाखवला असता त्यानी तो सामान्य असल्याची बतावणी केली होती व घरी जाण्यास सांगितले होते.
परंतु सदर मयत महिलेस त्रास कमी झाला नाही.परिणामी सदर कुटुंब डॉ.फडके यांचेकडे उपाचारर्थ गेले होते.त्यांनी औषध उपचार चालू केला व तपासणी केली असता पोटात सेप्टिक झाले असल्याचे निदान करून शस्त्रक्रिया करावी लागेल असा सल्ला दिला होता.
दरम्यान त्यानुसार त्यांनी मयत महिलेची दि.२८ मे रोजी शस्त्रक्रिया केली होती.तथापि सदर महिलेच्या पोटातील वेदना कमी झाल्या नाही.दरम्यान सदर महीलेचा पोटातील त्रास कमी झाला नाही.परिणामी दि.३० मे २०२५ रोजी तिचा मृत्यू झाला होता.दरम्यान हा मृत्यू डॉ.मयुर तिरमखे यांनी आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याने झाला असल्याचा दलीत संघटनांचा व मयत महिलेचा पती माधव शिंगाडे यांनी केला आहे.
त्यामुळे डॉ.मयूर तिरमखे यांचे विरुध्द सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सदर कुटुंबाने केली आहे.त्याबाबत आज हा मोर्चा आयोजित केला होता.त्याला नारिकानी प्रतिसाद दिला असल्याचे दिसून आले आहे.सदर कुटुंबास अल्पवयीन तीन मुली असल्याने अनेक वक्त्यांनी त्यांना न्याय मिळणे गरजेचे असल्याचे अधोरेखित केले आहे.त्यांना अनेकांनी दुजोरा दिला आहे.
दरम्यान या मोर्चा बाबत मोर्चेकऱ्यांनी कोपरगाव शहरात विविध ठिकाणी मोर्चाचे बॅनर झळकावले होते.त्याला कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी संशयित आरोपी डॉकटर याचे सांगण्यावरून हरकत घेतली असल्याचे आरोप करण्यात आला आहे.सदर मयत महिलेला न्याय मिळत नाही तो पर्यंत हा लढा चालू राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान या मोर्चात घोषणा देताना काही कार्यकर्ते दुसऱ्या डॉकटरचे नाव घेण्यापासून काही कार्यर्कत्यांना रोखत असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान वेळी मोर्चेकऱ्यांनी कोपरगाव तहसीलच्या नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.यावेळी शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने मयत महिलेचा उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मयूर तिरमखे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”आपल्याकडे सदर मयत महिलेवर उपचार केल्यानंतर तिला त्रास होत होता तर ती बाब संबंधितांनी नैतिक जबाबदारी म्हणून आमच्या लक्षात का आणून दिली नाही ?
उपचार व पुन्हा दुसरी शस्त्रक्रिया अन्यत्र का केली ? केली असेल तर तेथे उपचार करणारे तज्ञ डॉक्टर होते का ? तेथे सर्जिकल सुविधा आणि एम.डी.डॉकटर होते का ? किंवा तशा योग्यतेचा डॉक्टरांनी देखरेख केली का ? त्या ठिकाणी आय.सी.यू.सुविधा होती का ? दुसरीकडे सदर महिलेची शस्त्रक्रिया केली असेल तर त्यांचेवर काही जबाबदारी नाही का ?
माझ्याकडे उपचार आणि शस्त्रक्रिया केल्यावर चौथ्या दिवशी पेशंट कसे दगावले ? आपण रुग्णांना बरे करणारे डॉक्टर असून रुग्णांना मारणारे डॉक्टर नाही असा खुलासा करताना आपण सामाजिक दायित्व सांभाळणारे असून अनेक असह्य रुग्णांना वाचवले आहे.वैद्यकीय क्षेत्रात माणसांना वाचविण्याचे एखादे रजिस्टर असते तर आमची नक्कीच वर नोंद झाली असती,दुर्दैवाने ती आज तरी वैद्यकीय क्षेत्रात नाही असा नाराजीचा सुर आळवला आहे.
दरम्यान आपण सैनिक,पोलिस,शाळेचे विद्यार्थी आदींची मोफत तपासणी करतो मग गरीब रुग्णांचे तपासणी शुल्क घेत नाही.अनेक आरोप करणाऱ्या कार्यकर्त्यांचे ऐकून बिल कमी करतो त्यावेळी आरोप करणाऱ्यांना आमच्यात सैतान का दिसत नाही ?
असा संतप्त सवाल विचारला आहे.असे निरुत्तर करणारे सवाल विचारले आहे.दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीस मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी काही अर्थपूर्ण तडजोडी बिघडल्याने हा आरोप झाला असल्याची माहिती असून त्या बाबत वैद्यकीय क्षेत्रात कुजबुज सुरू आहे.त्याबाबत काही क्लिप असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.
त्यामुळे आगामी काळात हे प्रकरण कोणते वळण घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.