Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
अ.नगरराजकीय

ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपर वरच निवडणुका घ्या! सिमोन ठकाजी जगताप

शिर्डी ( प्रतिनिधी) सध्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका पार पाडल्या .त्या ईव्हीएम मशीन द्वारे निवडणुका घेण्यात आल्या. मात्र अनेक ठिकाणी मशीन बाबत साक्षमता निर्माण झाली असून तशी चर्चा राज्यात सुरू आहे. अनेकांनी येथून पुढील सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर (मतपत्रिकेवर) घेण्याचे मागणी केली आहे.
अशी मागणी यापूर्वीच 30 डिसेंबर 2024 रोजी राहता तालुक्यातील निमगाव कोराळे येथे झालेल्या ग्रामसभेत ठरावाद्वारे करण्यात आली होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


‌ राहता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे ग्रामपंचायत असून येथे 30 डिसेंबर 2024 रोजी ग्रामसभा संपन्न झाली.
या सभेमध्ये ईव्हीएम मशीन ऐवजी सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात. अशी मागणी करण्यात आली होती.
सिमोन ठकाजी जगताप यांनी ग्रामसभेत याविषयी सूचना केली,व शामकांत भाऊसाहेब कातोरे यांनी त्यास अनुमोदन दिले होते .त्यावर उपस्थित ग्रामस्थांमध्ये साधक बादक चर्चा होऊन हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता.

या ग्रामसभेतील ठराव क्रमांक पाच तीन नुसार हा ठराव संमत झाला. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी ईव्हीएम मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावेत.अशी मागणी निमगाव कोऱ्हाळे ग्राम सभेत करण्यात आली होती व ती मंजूर झाली होती. ग्रामस्थांचे म्हणणे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असेच होते. असे यावरून दिसते. पण ही मागणी शासनाने, निवडणूक आयोगाने मनावर घेतली नाही.

त्यामुळे झालेल्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन वर अनेक ठिकाणी संशय निर्माण होत आहे. तशी चर्चा होत आहे. जर ईव्हीएम मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपरवर या निवडणुका झाल्या असत्या तर अशी सरकार ,व निवडणूक आयोग याविषयी संशयास्पद भूमिका नागरिकांची राहिली नसती.

येथून पुढील निवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात . यात निवडणूक आयोगाची अडचण काय आहे? असा सवालही त्यांनी केला असून येणाऱ्या निवडणुका या बॅलेट पेपर वरच घेण्यात याव्यात. अशी परत एकदा मागणी सिमोन ठकाजी जगताप यांनी प्रसिद्धीला दिलेल्या एका पत्रकाद्वारे केली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button