Letest News
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप... राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप) सुनील निवृत्ती पाटील शिंदे यांचा प्रचंड दावा : “प्रभाग २ मध्ये नंदूभाऊंचा विजय ठरलेलाच… विरोधकांची ब... एआय बनावट वन्यप्राणी व्हिडिओवाल्यांना थेट जेल — एसपी सोमनाथ घार्गे यांची कडक सूचना”
अ.नगरखेळ

मुला – मुलींचे लग्न यावर ‘साई तारा’ ग्रुपतर्फेरविवारी श्रीरामपूरात चर्चासत्र आणी मेळावा

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
सध्याच्या कलियुगामध्ये मुला – मुलींचे लग्न करणे ही एक मोठी समस्या झाली असून त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी श्रीरामपूर येथील ‘ साई तारा ‘ मराठा वधू – वर ग्रुपतर्फे रविवार दि . २१ जुलै २०२४ रोजी ‘ मुला – मुलींचे लग्न ‘ या विषयावर एक दिवसाचे चर्चासत्र व फक्त मराठा समाजातील मुला – मुलींचा वधू – वर मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती साई तारा मराठा ग्रुपचे ॲडमिन निवृत्त प्राध्यापक, पत्रकार रामचंद्र ताराबाई सुंदरदास राऊत यांनी सांगितली.
श्रीरामपूर येथील मेनरोडवरील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या आगाशे सभागृहात रविवार दि. २१ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ . ०० वाजता हे चर्चा सत्र आणी वधू – वर मेळावा आयोजित करण्यात आला असून या चर्चा सत्राची व वधू – वर मेळाव्याची प्रवेश फी फक्त पाचशे रुपये ठेवण्यात आली आहे.
या चर्चा सत्रात अ.नगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . माहेश्वरी वीरसिंग गावित , श्रीरामपूर येथील प्राईड ग्रुप ऑफ स्कूलच्या संस्थापिका डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे आणि साई तारा ग्रुपच्या ॲडमिन आणि माजी प्राचार्या रजनीताई रघुनाथ गोंदकर उपस्थित राहून वधू – वर आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करणार असल्याचेही प्रा.राऊत यांनी सांगितले.
आज मुला – मुलींचे लग्न जमविणे एक चिंतेचा विषय झाला आहे. अनुरूप जावई आणि अनुरूप सून मिळावी असे प्रत्येक पालकाला वाटत असते. अशा या मूलभूत प्रश्नावर सामूदायिक चर्चा घडावी व वधू – वरांसह त्यांच्या पालकांना या संदर्भात मार्गदर्शन मिळावे या हेतूने या चर्चा सत्राचे व वधू – वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
हे चर्चासत्र व वधू – वर मेळावा यशस्वी करण्यासाठी ग्रुपचे ॲडमिन श्रीमती मीनाताई जगताप , सौ . रामेश्वरी लाटे , श्री . संतोष जगताप पाटील, प्राचार्या रजनीताई गोंदकर व प्रा . रामचंद्र राऊत आणी त्यांचे सहकारी प्रयत्नशील आहेत .
या चर्चासत्रास व मेळाव्यास मराठा समाजतील वधू – वर व त्यांच्या पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे . अधिक माहिती साठी ९२२५ ३१४ ७२९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button