Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
राजकीयशिर्डी

परिवर्तनाच्या प्रवासातील प्रत्येक सहकाऱ्याचे मनःपूर्वक आभार – सौ. जयश्री विष्णू थोरात यांचे भावनिक निवेदन

शिर्डी, दि.–
नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारयात्रेला आज मतदानाची सांगता झाली असताना, महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. जयश्री विष्णू थोरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांप्रति आणि नागरिकांप्रति मनापासून कृतज्ञता व्यक्त करणारे भावनिक निवेदन जारी केले.

sai nirman
जाहिरात

“या संपूर्ण प्रचार काळात माझ्यासोबत घरोघरी फिरत, खांद्याला खांदा लावून या परिवर्तनाच्या प्रवासात सहभागी झालात, त्या प्रत्येक साथीदाराचे मनःपूर्वक आभार,” अशा शब्दांत सौ. थोरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांप्रति विशेष प्रेम व्यक्त केले. मागील काही आठवड्यांपासून त्यांनी प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाची दिशा जाणून घेतली होती. या संपूर्ण प्रवासात त्यांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि जनतेचा सहभाग हेच त्यांच्या उत्साहाचे खरे बळ असल्याचे त्या म्हणाल्या.

आजच्या मतदानानंतर सौ. जयश्री थोरात यांनी नागरिकांना विश्वास दिला की, “निकाल काहीही असो, लोकसेवेचा माझा संकल्प आणि प्रामाणिकपणा तसाच कायम राहील.” जनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे परिवर्तनाचा मार्ग अधिक दृढ झाल्याचेही त्या म्हणाल्या.

DN SPORTS

प्रचारादरम्यान महिलांनी, युवकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आणि सर्व समाजघटकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. त्या पुढे म्हणाल्या, “शिर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी, स्वच्छ-सुरक्षित आणि सुसंस्कृत शहरासाठी मी सदैव तत्पर राहीन.”

निवेदनाच्या शेवटी सौ. थोरात यांनी सर्वांना पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद देत आश्वासन दिले की, जनतेचा विश्वास हीच त्यांची खरी जमेची बाजू आहे आणि भविष्यातही त्या त्याच निष्ठेने सार्वजनिक जीवनात कार्यरत राहतील.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button