Letest News
"छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष... रस्ता अडवल्याच्या कारणावरून रक्तरंजित हल्ला-बीअरच्या बाटल्यांनी दोघांना केले रक्तबंबाळ ३० दारू धंदे अभयात एकावरच कारवाई-मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाची सुई! मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड
राजकीयशिर्डी

लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारांना तातडीचे निर्देश

शिर्डी (वार्ताहर):
शिर्डीतील लक्ष्मीनगर परिसरातील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, उपविभागीय अधिकारी कार्यालय शिर्डी यांनी या प्रकरणात मोठी हालचाल सुरू केली आहे.
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी माणिक भाऊराव आहेर यांनी तहसीलदार कार्यालय राहाता यांना दिलेल्या आदेशात लक्ष्मीनगरमधील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अर्जदार काळू सखाराम आरणे व इतर रहिवाशांनी सादर केलेल्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे, लक्ष्मीनगर परिसरात सन १९७५ पासून अनेक कुटुंबे वास्तव्यास आहेत. “भूमीहीन मजुरांना घरे देण्याची योजना” अंतर्गत सुमारे १०१ घरे असून, याशिवाय जवळपास २५० अतिक्रमणधारक कुटुंबे येथे राहतात.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या सर्व कुटुंबांना शासनाच्या निर्णयानुसार मालकी हक्काचे ७/१२ उतारे मिळावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित कागदपत्रांची (नगरपालिका उतारे, घरपट्टी, झोन दाखले आदी) सखोल पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, सर्वांसाठी घरे २०२२ धोरण तसेच महसूल विभागाच्या २०२५ च्या शासन निर्णयानुसार, सन २०११ पूर्वीपासून शासकीय जागेवर वास्तव्यास असलेल्या पात्र कुटुंबांना जागांचे पट्टे देण्याची तरतूद आहे. याच नियमांच्या अधीन राहून अतिक्रमणे नियमित करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.


तहसीलदारांना स्थळपाहणी करून प्रत्यक्ष परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, कार्यवाहीचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे लक्ष्मीनगरमधील शेकडो कुटुंबांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button