Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
अ.नगरक्राईम

भुशी डॅमवर पाच जणांचं कुटुंब संपलं घटना अत्यंत दुर्दैवी

लोणवळा येथील भुशी डॅम परिसरात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू होण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही पहिलीच घटना नसून अशा घटना पावसाळ्यात वारंवार होत आहेत, मात्र अशा दुर्घटना होऊ नयेत, म्हणून राज्य सरकारने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काय व्यवस्था निर्माण केली आहे? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत विचारला.पावसाळ्यात लोणावळ्याप्रमाणेच राज्याच्या इतर भागातही पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देत असतात.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

पावसाळ्यातील पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत, ते सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी पटोलेंनी केली. विधिमंडळात स्थगन प्रस्ताव मांडत नाना पटोले यांनी भुशी डॅम दुर्घटनेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. भुशी डॅमवर घडलेल्या या दुर्घटनेत नूर शाहिस्ता अन्सारी (वय ३५), अमिना अदिल अन्सारी (वय १३), मारिया अन्सारी (वय ७), हुमेदा अन्सारी (वय ६) आणि अदनान अन्सारी (वय ४, सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) हे सर्व पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. यापैकी तिघांचे मृतदेह काल सापडले होते. तर आज आणखी एकाचा मृतदेह सापडला आहे. एकजण अद्यापही बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरु आहे

.लग्नसोहळ्यासाठी अन्सारी कुटुंब आणि नातेवाईक एकत्र आले होते. २७ तारखेला लग्न झालं. गुलजार अन्सारी यांचे तारिक अन्सारीसोबत लग्न झाले. त्यानंतर दोन दिवसांपासून सगळ्यांचं पावसाळी पिकनिकचं प्लॅनिंग सुरु होतं. रविवार ३० तारखेच्या सकाळी सर्व जण भुशी डॅम परिसरात आले. ते एकूण १७ जण होते, टेम्पो ट्रॅव्हलरने सगळे जण आले होतेलोणावळ्याच्या ज्या धबधब्यात अन्सारी कुटुंब वाहून गेलं.

तिथे एरवी पाण्याचा फारसा प्रवाह नसतो. दुर्घेटनेच्या आधीही पाण्याचा प्रवाह फारसा नसल्याने अन्सारी कुटुंबा तिथल्या खडकावर उभं राहून मजा मस्ती करत होते. पण मुसळधार पाऊस सुरु झाला आणि पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे एका महिला, दोन मुली आणि दोन लहान मुलं खडकावरच अडकले. त्यांना वाचवण्याचा बराच प्रयत्न करण्यात आला. पण दु्र्देवाने पाण्याच्या प्रवाहात पाचही जण वाहून गेले

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button