शिर्डी | शिर्डी म्हणजे श्रद्धा, विश्वास आणि भक्तीचे साई मंदिर. येथे लाखो भाविक रोज साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. या लाखोंच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे हात मजबूत असणे आवश्यक आहे—आणि हेच मजबूत, दांडगे आणि कर्तव्यनिष्ठ नेतृत्व आज श्री साईबाबा संस्थानच्या संरक्षण विभागाला लाभले आहे, श्री रोहिदास माळी यांच्या रूपाने.
दि. ११ डिसेंबर रोजी मंदिरात घडलेला प्रामाणिकतेचा प्रसंग संपूर्ण देशात गौरवला जात असताना, या यशाचं मूक पण सर्वात महत्त्वाचं श्रेय आहे ते माळी सरांच्या तपश्चर्येसम असलेल्या सेवाभावाला.

ह्यापूर्वी अनेक संरक्षण अधिकारी आलेत परंतु कोणीही अश्या प्रकारे कर्मचारी यांना पाठबळ दिला नाही वकोनीही प्रामाणिक कर्मचारी यांचा सन्मान केला नाही माळी साहेब आले आणि संरक्षण विभागाच्या संस्कृतीत ‘चमत्कारिक परिवर्तन’ घडलं माळी सर जेव्हापासून संस्थान सुरक्षा प्रमुख झाले, तेव्हापासून सुरक्षा विभागात एक गोष्ट बदलली—”कार्यशैली नाही, तर मनाची वृत्ती बदलली.”
पूर्वी सुरक्षा म्हणजे नुसता बंदोबस्त आज सुरक्षा म्हणजे विश्वासाची हमी. पूर्वी रक्षक म्हणजे कर्मचारी. आज रक्षक म्हणजे साईबाबांच्या घराचे सेवक. हे परिवर्तन स्वतः होत नाही. हे परिवर्तन होतं नेतृत्वामुळे… आणि हे नेतृत्व आहे रोहिदास माळी.
घटना छोटी नव्हती—आणि त्यामागचे मूल्य खूप मोठे होते
मंदिराच्या पाठीमागे एक बॅग सापडते त्या बॅगेमध्ये १०,००० USD (9 लाख रुपये) आणि परदेशी साईभक्ताचा पासपोर्ट. एका क्षणाचा पण अपविहार नाही… टंचाई नाही… दुचित्ता नाही… प्रामाणिक कर्मचारी श्री कृष्णा कुलकर्णी यांनी बॅग सरळ संरक्षण कार्यालयात दिली. ही कृती करताना त्यांना माहीत होतं— माळी सरांना चुकीचं काम चालणार नाही… पण बरोबर कामाला नेहमी शंभर टक्के संरक्षण मिळणारच!” कुलकर्णी यांच्या मनामध्ये असलेली ही खात्री हीच माळी सरांनी विभागात रुजवलेली संस्कृती आहे.
माळी सरांचे शब्द—ज्यांनी विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांचे आयुष्य बदलले
माळी सर वेळोवेळी एकच वाक्य सांगतात “आपल्या हातात ठेवलेली जबाबदारी फक्त नोकरी नाही, ती साईंची सेवा आहे.” ही वाक्ये तिथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचार्यासाठी मार्गदर्शक मंत्र बनली आहेत. दोन मिनिटे उशीर झाला तरी चौकशी,
तेढ पाहूनही शांतपणे अनुशासन, विकट परिस्थितीतही संयम, आणि भाविकांसमोर नेहमी विनम्रता… या सगळ्या गुणांनी सुरक्षा विभाग आज देशातील सर्वात विश्वासार्ह व्यवस्थांपैकी एक मानला जात आहे. कुलकर्णी यांनी केलेल्या प्रामाणिक कार्याचे कौतुक करताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडिलकर म्हणाले— ही फक्त एका कर्मचाऱ्याची प्रामाणिकता नाही, ही विभागाच्या नेतृत्वाची शिकवण आहे.” माळी सरांच्या कार्यामुळे आज भाविकांना शिर्डीत ‘सुरक्षित घर’ असल्यासारखे वाटते.” प्रत्येक वरिष्ठ अधिकारी एकच गोष्ट मान्य करतात— रोहिदास माळी सरांनी संरक्षण विभागाचा चेहरामोहरा बदलला.
भाविकांसाठी माळी सर म्हणजे ‘विश्वासाचा अवलंब’
कुठलाही भाविकाचे हरवलं सामान, पासपोर्ट, मोबाईल किंवा पर्स घेऊन संरक्षण कार्यालयात येतो… त्याच्या डोळ्यांत भीती असते, टेन्शन असते… पण संरक्षण विभागातील कर्मचारी त्याला सांगतात— “घाबरू नका, आपण शिर्डीत आहात… सर्व काही सुरक्षित आहे.” ही वाक्ये केवळ शब्द नाहीत— ही खात्री माळी सरांनी निर्माण केलेली आहे. आज शिर्डीत जेव्हा एखादी हरवलेली वस्तू मालकाशी परत मिळते, कोणी अडचणीत सापडलेला भाविक मदतीने बाहेर पडतो, तेव्हा या प्रत्येक यशाच्या पाठीमागे एक सावली असते— ती सावली म्हणजे रोहिदास माळी यांचे संयमी, कटाक्ष पण हृदयाने देवभक्त असलेले नेतृत्व.
“साईंच्या मंदिराची सेवा करताना प्रत्येक श्वास जबाबदारीचा असतो” – माळी सरांचे तत्त्वज्ञान
माळी सर स्वतः फाईलवर बसणारे अधिकारी नाहीत. ते मंदिर परिसरात फिरतात, कर्मचार्यांशी बोलतात, सीसीटीव्ही मॉनिटरिंग तपासतात, आणि प्रत्येक क्षणाला भाविकांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवतात. त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण विभागात एकच भावना निर्माण झाली आहे— “काहीही झालं तरी भाविकांचा विश्वास ढळू द्यायचा नाही.”
**देश–विदेशातील भाविक शिर्डीत निश्चिंत का असतात?
आज शिर्डीच्या सुरक्षा व्यवस्थेची चर्चा महाराष्ट्रात नव्हे तर परदेशातही केली जाते. कारण— जिथे दररोज लाखो लोक येत असतात, तिथे एक छोटी चूकही मोठे संकट बनू शकते. पण माळी सरांच्या तपशिलात जाणाऱ्या कार्यपद्धतीमुळे या गर्दीमध्येही सुरक्षितता, पारदर्शकता आणि विश्वास टिकून आहे.
कुलकर्णी यांनी प्रामाणिकतेने परत केलेली ९ लाखांची बॅग ही केवळ एका प्रसंगाची बातमी नाही— ही संस्कारांची, नेतृत्वाची आणि कर्तव्याची साक्ष आहे. आज सुरक्षा कर्मचारी आदर्श बनत आहेत, संस्थानची प्रतिमा उजळत आहे, भाविकांना विश्वास वाटतो आहे, देश-विदेशात शिर्डीचे नाव पोहोचत आहे…

