Letest News
वंदे भारतने मुंबई ते शिर्डी-मुख्यमंत्री फडणवीसांचा साधेपणाचा संदेश राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस साईचरणी नतमस्तक-भक्ती ते शक्ती : शिर्डीत डिफेन्स प्रकल्पाचे भव्य ... “शिर्डीत पेट्रोलसाठी झुंबड! पंपांवर लांबच लांब रांगा=नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन” स्मार्ट ग्राम’चा फक्त गाजावाजा; सावळीविहीरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!”“CCTV बंद स्ट्रीट लाईट गुल-सावळी... “क्लबवर छापे… पण ‘मुख्य सूत्रधार’ अजूनही मोकाट?”“राहात्यात अवैध धंद्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त?” “गर्भलिंग चाचणी रॅकेटचे धागेदोरे निफाडपर्यंत १८ आरोपी जेरबंद ६ डॉक्टर अटकेत!” “शिर्डी-राहात्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ- पिपाडा यांचा अप्रत्यक्ष निशाणा विखेंवर!” “राजकीय वरदहस्तामु... सावळी विहीरमध्ये घरफोडीचा थरार- कडी-कोयंडा तोडून चोरट्यांचा धुमाकूळ ! शिर्डीत भरदिवसा रक्तरंजित थरार- दुकानदारावर जीवघेणा हल्ला कॉकरोच जनता पार्टी”मुळे देशभरात बेरोजगारांचा संताप उफाळला-८ मिलियन तरुण एकवटले! साई संस्थानवर गंभीर...
अ.नगरक्राईम

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण तापलं-अंजली दमानियांचे धक्कादायक खुलासे ‘समता’ पतसंस्थेवर संशयाची सुई

कोपरगाव : भोंदूगिरी, आर्थिक फसवणूक आणि महिलांच्या शोषणाच्या आरोपांनी गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून, संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राजकीय संबंधांचाही मुद्दा पुढे येत असल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


💣 अंजली दमानियांचा स्फोटक आरोप
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत ठोस पुरावे सादर करत मोठे दावे केले. ‘समता’ पतसंस्थेतील व्यवहारांवर संशय व्यक्त करत त्यांनी एक धक्कादायक पॅटर्न उघड केला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 या कालावधीत मर्यादित संदेश येणाऱ्या खात्यांवर अचानक जानेवारी 2026 मध्ये मेसेजचा पूर आला.
👉 27 जानेवारी : 17 मेसेज
👉 28 जानेवारी : 19 मेसेज
👉 29 जानेवारी : 10 मेसेज
👉 30 व 31 जानेवारी : प्रत्येकी 8 मेसेज
विशेष म्हणजे, हा कालावधी अजित पवार यांच्या अपघाताच्या सुमारास असल्याने दमानिया यांनी थेट सवाल उपस्थित केला — “जे व्यवहार महिनाभरात होत नव्हते, ते अचानक एका-दोन दिवसांत कसे झाले?”


🕵️‍♂️ SIT चौकशीची मागणी
या संशयास्पद व्यवहारांची विशेष तपास पथक (SIT) मार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी दमानिया यांनी केली आहे. या खुलाशांमुळे तपास यंत्रणांवरही दबाव वाढला आहे.
💰 कोट्यवधींचा घोटाळा?
दरम्यान, कोपरगाव येथील ‘समता’ पतसंस्थेमध्ये अशोक खरात याचे शेकडो बोगस खाते असल्याचे समोर आले आहे. या खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होत असून, आर्थिक गैरव्यवहाराचा मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.


😨 ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण
या सर्व घडामोडींमुळे ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी आपली ठेव काढण्यास सुरुवात केली असून, पतसंस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे.
⚠️ महिलांच्या तक्रारी; अजूनही अनेक गप्प
आत्तापर्यंत केवळ 10 महिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र, समाजातील बदनामीच्या भीतीमुळे अनेक पीडित महिला पुढे येण्यास टाळाटाळ करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
👉 या सर्व घडामोडींमुळे अशोक खरात प्रकरण आता केवळ फसवणुकीपुरते मर्यादित न राहता, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक पातळीवर मोठा स्फोट ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button