Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
क्राईमशिर्डी

हत्या होऊनही आरोपी फरार, पोलिस गप्प! राहाता पोलिसांवर पाठीशी घालण्याचा आरोप-कायद्याचा वचक कुठे?

शिर्डी | प्रतिनिधी
“वेळेवर पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले असते, तर आज माझा भाऊ जिवंत असता!”
हा आक्रोश आहे सचिन स्थानराव गिढे या तरुणाच्या कुटुंबीयांचा, ज्याचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली आणि मृतदेह गोदावरी नदीत फेकून देण्यात आला.
या गंभीर प्रकरणात राहाता पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळेच आरोपींचे फावले, असा थेट आरोप आता पीडित कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणी मृताचा भाऊ अमोल स्थानराव यांनी सामाजिक नेते मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडे कडक शब्दांत निवेदन सादर करून न्यायासाठी हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
🟥 अपहरणाची माहिती असूनही ‘मिसिंग’ची नोंद!
घटना घडताच सचिन गिढे यांच्या पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन
➡️ पतीचे अपहरण झाल्याची स्पष्ट माहिती दिली
➡️ संशयित आरोपींची नावेही सांगितली
मात्र तरीही, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल न करता केवळ ‘मिसिंग’ची नोंद करून गंभीर दुर्लक्ष केले.
या हलगर्जीपणामुळे आरोपींना पुरावे नष्ट करण्यास व हत्या करण्यास वेळ मिळाला, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
🟥 हत्या होऊनही पोलिसांचा संथ तपास
10/12/2025 रोजी सचिन गिढे यांची हत्या झाल्याचे स्पष्ट असतानाही
➡️ 11/12/2025 रोजी उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल
➡️ तपास अपूर्ण असतानाही काही आरोपींना CR-20 अंतर्गत लाभ
➡️ मुख्य आरोपींपैकी प्रवीण नानासाहेब वाघमारे आजतागायत फरार
➡️ तरीही पोलिसांकडून अटक नाही
या साऱ्या बाबींमुळे आरोपींना पाठीशी घालण्याचा गंभीर संशय बळावत आहे.
🟥 “ही हत्या नव्हे, तर यंत्रणेचा खून!”
पीडित कुटुंबीयांचा आरोप आहे की,
ही घटना केवळ एका तरुणाची हत्या नसून
👉 पोलिस यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा बळी
👉 कायद्याच्या अंमलबजावणीतील अपयश
👉 गरीब कुटुंबाच्या न्यायाचा खून
आहे.
🟥 कुटुंबाच्या ठाम मागण्या
पीडित कुटुंबाकडून पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत —
🔴 सर्व आरोपींना तात्काळ अटक
🔴 फरार आरोपी प्रवीण वाघमारे यास त्वरित जेरबंद करणे
🔴 सर्व आरोपींवर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई
🔴 अमानुष हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा
🔴 अपहरण असूनही गुन्हा नोंद न करणाऱ्या व तपासात दिरंगाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई
🟥 सवाल जनतेचा : पोलिस कुणाच्या बाजूने?
या प्रकरणामुळे राहाता–शिर्डी परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
“पोलिस वेळेवर काम करत नाहीत, आरोपी मोकाट फिरतात आणि निरपराध मरतो”
असा रोखठोक सवाल आता जनतेकडून विचारला जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button